शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

Video: शिवसेना स्वार्थी... शेतकरी प्रश्नावरुन नवनीत राणा लोकसभेत आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 3:28 PM

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्यास फक्त शिवसेनाच जबाबदार आहे.

नवी दिल्ली - अमरावती मतदारसंघातील खासदार नवनीत राणा कौर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लोकसभेतील आपल्या भाषणावेळी नवनीत कौर यांनी शिवसेनवर जहरी टीका केली. शिवसेनेच्या खासदारांनी शेतकऱ्यांसाठी संसदेबाहेर घोषणाबाजी केली. पण, आपल्या स्वार्थासाठी, आपल्या लालचेसाठी, आपल्या पोस्टसाठी शिवसेना महाराष्ट्रात सरकार स्थापन करत नाही. जनतेनं मताधिक्य दिल्यानंतरही शिवसेना युतीतून बाहेर का पडली, असे म्हणत राणा यांनी शिवसेनेवर जबरी प्रहार केला. 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्यास फक्त शिवसेनाच जबाबदार आहे. स्वत:चा स्वार्थ आणि स्वत:च घर भरण्याऐवजी शेतकऱ्यांसाठी शिवसेनेनं सत्ता स्थापन करायला हवी होती. आज महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला असून शेतकऱ्यांना मदत करायची भावना असल्यास मी स्वत:च घरही जाळायला तयार आहे. पण, शिवसेना सत्ता स्थापनेपासून दूर केली. मी जिल्ह्यातील तालुक्यात फिरुन, फिरुन पाहिलंय. शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन, मुग आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय. पण, आज आमच्या राज्याला माय-बाप कुणीच नाही. त्यामुळे, केंद्र सरकारच आमचं मायबाप असून केंद्राने आम्हाला 50 हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी पुरस्कृत खासदार नवनीत राणा कौर यांनी केली आहे.

पाहा व्हिडीओ - 

नवनीत कौर यांनी शिवसेनेवर टीका केल्यानंतर सभागृहात त्यांना विरोध करण्यात आला होता. मात्र, मी आज थांबणार नाही, आज कुणीही माझा आवाज बंद करू शकणार नाही. मी माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं गाऱ्हाण सांगणारचं, असे म्हणत कौर यांनी लोकसभेत आक्रमकपणे भूमिका मांडली.  

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाFarmerशेतकरीdroughtदुष्काळ