दोघे २० फूट हवेत उडाले तर दोघांना फरफटत नेलं; कारच्या धडकेत बालपणीच्या मित्रांचा भयानक मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:30 IST2025-06-02T14:10:54+5:302025-06-02T14:30:26+5:30
उत्तर प्रदेशात घडलेल्या एका भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दोघे २० फूट हवेत उडाले तर दोघांना फरफटत नेलं; कारच्या धडकेत बालपणीच्या मित्रांचा भयानक मृत्यू
Gorakhpur Accident: उत्तर प्रदेशातून अपघाताची अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे एक भरधाव कार आणि बाईकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत चार तरुणांचा मृत्यू झाला. विरुद्ध दिशेने आलेल्या एसयूव्ही कारने तरुणांच्या बाईकला जबर दिली आणि हा अपघात घडला. ही संपूर्ण घटना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन तरुण काही फूट हवेत उडाले तर दोघे फरफटत गेले.
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एसयूव्ही कार आणि बाईकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात बाईकवरील चार तरुणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा भीषण अपघात कैद झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कार चालकाचा शोध सुरू केला आहे. गोरखपूर-वाराणसी राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. बाईकस्वार पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. अपघात इतका भीषण होता की धडकेमुळे दोन तरुण हवेत २० फूट उडाले तर दोन तरुण कारच्या बोनेटमध्ये अडकले. कार चालकाने त्यांना सुमारे १०० मीटर फरफटत नेले. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजता घडल्याचे सांगण्यात आलं.
या अपघात प्रदमुन कुमार, राहुल कुमार, सुनील कुमार आणि अरविंद कुमार या चारही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे चौघेही रंगकाम करत होते आणि गावातून गोरखपूर शहरात जात होते. राहुल कुमारचे नुकतेच लग्न झाले होते. घटनेनंतर गावकरी घटनास्थळी जमा झाले आणि पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गुन्हा दाखल केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
रिकॉर्ड हो गया नही कोई यकीन नही करता..!!
— Gaurav Kushwaha-Journalist (@Newscopgaurav) June 1, 2025
गोरखपर में कार की टक्कर से बाइक सवार 4 युवकों की मौत हो गई,2 युवक 20 फुट ऊपर हवा में उछले, दो को कार ने 100 मीटर तक घसीट दिया.!!
स्पीड जानलेवा होती है कब समझेगा आज का युवा..!!#roadaccidentpic.twitter.com/nWauvgbOl4
गावकऱ्यांनी सांगितले की, अरविंद एका आठवड्यापूर्वी बंगळुरूहून घरी आला होता. तो तिथे रंगकाम करायचा. ते चौघेही बालपणीचे मित्र होते. अरविंद आल्यानंतर ते चौघेही सकाळपासून एकत्र बाहेर फिरायला निघाले होते. शनिवारीही जेव्हा ते चौघेही एकाच बाईकवरून बाहेर पडले तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. अनेकांनी त्यांना थांबवले पण त्यांनी कुणाचेही ऐकले नाही आणि गावाबाहेर पडले. त्यानंतर काही तासांतच त्यांच्या मृत्यूची बातमी आली.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, या चौघांचाही मृत्यू निष्काळजीपणामुळे झाला आहे. हे चारही तरुण कुटुंबासाठी पैसे कमवत होते आणि ते त्यांच्या कुटुंबियांना देत होते. त्यांच्या कमाईवरच कुटुंबाचा खर्च चालत होता. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अपघातानंतर कारचा चालक गाडी तिथेच सोडून घटनास्थळावरुन पसार झाला. गाडीत सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे आणि सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु करण्यात आला आहे.