शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
2
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
3
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
4
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
5
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
6
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
7
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
8
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
9
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
10
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
11
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
12
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
13
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
14
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
15
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
16
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
17
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
18
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
19
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
20
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

Uttar Pradesh Election 2022: साहेब, मी जिवंत आहे! १८ वर्ष न्यायासाठी संघर्ष; मृत व्यक्ती उत्तर प्रदेश निवडणुकीत उभं राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 15:49 IST

अथक प्रयत्नानंतरही जेव्हा संतोषला न्याय मिळाला नाही तेव्हा त्याने उत्तर प्रदेश निवडणुकीत उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीचा सिनेमा ‘कागज’साऱखी कहानी रिअल लाइफमध्ये घडल्याचं अनुभवायला मिळत आहे. वाराणसी इथं गेली १८ वर्ष एक व्यक्ती स्वत: जिवंत असल्याचा पुरावा देत आहे. परंतु महसूल विभाग आजही या व्यक्तीला मृत मानत आहे. बनारसच्या छितौनीमधील हा प्रकार ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. साहेब, मी जिवंत आहे अशा शब्दात हा व्यक्ती प्रशासनासमोर पुरावा दाखवूनही हतबल झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बनारसच्या छितौनी जिल्ह्यात राहणाऱ्या संतोष मूरत सिंह यांचा महसूल विभागाच्या नोंदीनुसार २००३ च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटात मृत्यू झालेला आहे. परंतु संतोषचा दावा आहे की, नातेवाईकांनी बनावट कागदपत्रे दाखवत मृत्यू प्रमाणपत्र काढलं. आणि त्याआधारे १२ एकर जमीन स्वत:च्या नावावर करत आणि ती तिसऱ्याच व्यक्तीला विकून टाकली. त्यामुळे संतोष सिंह न्यायासाठी प्रशासनाकडं विनवणी करत आहे.

अथक प्रयत्नानंतरही जेव्हा संतोषला न्याय मिळाला नाही तेव्हा त्याने उत्तर प्रदेश निवडणुकीत उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:ला जिवंत सिद्ध करण्यासाठी गेल्या १७ वर्षापासून तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आतापर्यंत त्याला यश मिळालं नाही. संतोष मूरत सिंह म्हणाला की, २०१२ राष्ट्रपती निवडणूक, २०१४, २०१९ मध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. या निवडणुकीत त्याचा अर्ज बाद झाला. परंतु आजही तो जिवंत असल्याचं सिद्ध झालं नाही. २०१७ मध्ये त्याने शिवपूर विधानसभा जागेवरुन निवडणूक लढवली परंतु त्याठिकाणी पराभव झाला.पुन्हा एकदा संतोष स्वत:ला जिवंत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची जन्मभूमी कानपूरमधून निवडणूक लढण्यासाठी अर्ज दाखल केला. पण तो रद्द करण्यात आला.

मुंबईला येत सुरु केले होते काम, परंतु...

बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांचा सिनेमा २००० मध्ये छितौनी इथं आला होता. त्यानंतर संतोष त्यांच्यासोबतच मुंबईला गेले आणि तिथे आचारी बनले. २००३ मध्ये मुंबईत ट्रेन ब्लास्ट झाला तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी संतोषविरोधात षडयंत्र रचत स्फोटात संतोष मारला गेला असं बनाव रचून मृत्यू प्रमाणपत्र मिळवलं आणि त्याची जमीन विकून टाकली. २००४ मध्ये संतोषला हे कळालं तेव्हापासून तो न्यायाची वाट पाहत आहे. परंतु अद्याप काहीच हाती लागलं नाही.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२