शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

मोदी सरकार असेपर्यंत समाधान नाही, काश्मीरबाबत इम्रान खान हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 10:20 IST

Kashmir Issue : मोदी सरकारच्या काळात भारताने काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला

नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्द्यावरुन भारतासोबतच्या लढाईत एकप्रकारे शरणागतीच पत्करली आहे. भारतात मोदी सरकार असेपर्यंत काश्मीरच्या मुद्द्यावर काहीच आशा नसल्याचं खान यांनी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात काश्मीर मुद्द्याबाबत समाधान होऊच शकत नाही, असेही खान यांनी म्हटले. 

मोदी सरकारच्या काळात भारताने काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला जसाश तसे उत्तर दिलंय. विशेष म्हणजे, भारताने सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानला धडा शिकवला. तर, जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटवून काश्मीरमधील विशेष कायदाही रद्द केला आहे. त्यामुळे, काश्मीर प्रश्नावरुन मोदी सरकार पाकिस्तानशी कुठलिही तडजोड करायला तयार नसल्याचं भारताने दाखवून दिलंय. त्यामुळे, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही काश्मीर मुद्दा मोदी सरकार असेपर्यंत सोडूनच दिलाय, असेच दिसून येते.

मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाजी आणि हटलर यांच्या विचारधारेचं अनुकरण करतात. त्यामुळे, भारतात मोदींचे सरकार असेपर्यंत काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघणार नसल्याचं खान यांनी म्हटलंय. बेल्जियमच्या टीव्ही नेटवर्क व्हीआरटीला दिलेल्या मुलाखतीमध्ये काश्मीर मुद्दयावरुन भारतासमोर पाकिस्तानने शरणागती पत्करल्याचेचं खान यांनी सूचवलंय. भारतात मजबूत आणि स्पष्ट विचारधारेचा माणूस देशाच्या नेतृत्वात आला, तरच काश्मीर प्रश्नावर समाधान निघेल, असेही इम्रान यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर