शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

Union Budget 2022: मध्यमवर्गीयांना करात दिलासा का नाही?; महाभारतातील ‘या’ श्लोकमध्ये दडलंय उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 17:01 IST

महाभारताच्या शांती पर्वच्या अध्याय ७२ मधील श्लोक ११ वाचून दाखवत निर्मला सीतारामन यांनी त्यांचे बोलणं समजावलं.

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या बजेटमध्ये देशातील मध्यमवर्गीय कुटुंबीयांना मागील ८ वर्षांपासून टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची आशा ठेवून बसले होते. परंतु यंदाही आयकरात काही बदल न केल्यानं नोकरदारवर्गाची निराशा झाली. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गीयांना टॅक्समध्ये दिलासा का नाही याबाबत सांगितले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Niramala Sitharam) महाभारतातील एका श्लोकचं उदाहरण देत सांगितले की,  राजाने कोणताही हलगर्जीपणा न करता आणि धर्मानुसार कर वसूल करावा. मी या देशातील करदात्यांचे आभार मानते कारण गरज असताना त्यांनी सरकारच्या हातांना मजबूत केले आहे. करदात्यांनी सरकारला नेहमी साथ दिली आहे.

महाभारताच्या शांती पर्वच्या अध्याय ७२ मधील श्लोक ११ वाचून दाखवत निर्मला सीतारामन यांनी त्यांचे बोलणं समजावलं. दापयित्वाकरंधर्म्यंराष्ट्रंनित्यंयथाविधि। अशेषान्कल्पयेद्राजायोगक्षेमानतन्द्रितः॥११॥ याचा अर्थ असा आहे की, राजाने कोणताही हलगर्जीपणा न करता आणि धर्मानुसार कर वसूल करावा. राजाने प्रजेच्या कल्याणाची व्यवस्था राजधर्माप्रमाणे, शिथिलता न ठेवता आणि धर्मानुसार कर वसूल करून केली पाहिजे. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आपल्या प्राचीन ग्रंथातून ज्ञान आणि मार्गदर्शन घेऊन आपण प्रगतीच्या मार्गावर चालत आलो आहोत. या अर्थसंकल्पातील प्रस्तावांमध्ये अधिक सुधारणा घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे. जे आमच्या स्थिर आणि प्रचलित कर प्रणालीच्या धोरणाच्या अनुषंगाने विश्वासार्ह कर व्यवस्था स्थापन करण्याच्या आमच्या दृष्टीकोनात पुढे जाऊ शकतो. यामुळे कर प्रणाली आणखी सुलभ होईल असं त्यांनी सांगितले.

गरीबांचं कल्याण अन् तरुणाईचं उज्ज्वल भविष्य निश्चित करणारा अर्थसंकल्प

विकासाचा नवा विश्वास घेऊन आलेला हा अर्थसंकल्प आहे. अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना अनेक संधी उपलब्ध करुन देणार हा अर्थसंकल्प आहे. यंदांचे बजेट more Infrastructure, More Investment, More Growth, आणि More Jobs च्या संभाव्यतेनं भरलेला बजेट आहे. त्यामुळे, ग्रीन जॉब्सच्याही संधी निर्माण होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत करत देशवासीयांना संबोधित केले.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022nirmala sitharamanनिर्मला सीतारामन