शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

'मोदींच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये 176% अन् शहीद जवानांच्या संख्येत 93% वाढ'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 3:58 PM

माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी म्हटलं की, दहशतवादाविरुद्ध संपूर्ण देश एकत्र आला आहे.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाकडून मोदी आणि भाजपा सरकारविरुद्ध मोहिम राबविण्यात येत आहे. मोदी सरकारकडून पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईकचे राजकारण केले जात असल्याचे सीपीएमने म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला उघडं पाडण्याचं काम सीपीएम करेल, असा ठरावच सीपीएमच्या झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. त्यानुसार सीपीएमचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात वाढलेल्या दहशतवादी घटनांची आकडेवारीच दिली आहे. 

माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी म्हटलं की, दहशतवादाविरुद्ध संपूर्ण देश एकत्र आला आहे. मात्र, भाजपाकडून या एकतेला तडा देण्याचं काम सुरू आहे. आगामी निवडणुकांमध्ये फायदा घेण्यासाठी भाजपा या मतभेद निर्माण करत आहे. भारतीय विरुद्ध मुस्लीम आणि भारतीय विरुद्ध काश्मिरी, असा वाद पेटविण्याचं काम भाजपाकडून सुरू आहे. केंद्र सरकारच्या एका समितीच्या आकडेवारीनुसार, मोदी सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 176% वाढ झाली आहे. तर नागरिक आणि सुरक्षा जवानांच्या मृत्युच्या संख्येतही 93% वाढ झाली आहे. सन 2014 ते 2018 या कालावधीत प्रत्येक महिन्याला 11 दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचं या आकडेवारीवरुन समोर आल्याचं येचुरी यांनी सांगितलं आहे. 

तसेच काश्मिरी तरुणांचे दहशतवादी संघटनांकडे वळण्याचे प्रमाणही याच काळात वाढले आहे. सन 2013 मध्ये हे प्रमाण 16 असे होते, पण आता 2018 मध्ये हे प्रमाण 164 पर्यंत पोहोचले आहे. भाजपाकडून जाणीवपूर्वक कट्टर राष्ट्रवादाला खतपाणी घालण्यात येत असून गंभीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातील सन 2018-19 चा जीडीपी हा 7 टक्के असून गेल्या 5 वर्षातील हा सर्वात कमी जीडीपी असल्याचेही येचुरी यांनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाMartyrशहीदSoldierसैनिक