शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
2
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
3
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
4
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
5
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
6
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
7
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
8
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
9
Viral Video: "बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य
10
Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर
11
PHOTOS: लग्नाच्या रोमान्सनंतर थेट टेनिस कोर्टवर... ४५ वर्षांची व्हीनस विल्यम्स रचणार इतिहास
12
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
13
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
14
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
15
८५ वर्षांवरील वयोवृद्धांना यंदा मतदान केंद्रावरच यावे लागणार, केंद्रांवर ज्येष्ठांसाठी सुविधा
16
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
17
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
18
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
19
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
20
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
Daily Top 2Weekly Top 5

Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:24 IST

Uma Bharti : इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी यावरून आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये पाच महिन्यांच्या अव्यानचा देखील समावेश आहे. तर अनेक लोकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी यावरून आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.

उमा भारती यांनी अत्यंत कठोर शब्दांचा वापर केला. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत या घटनेला 'कलंक' म्हटलं आहे. उमा भारती यांनी स्पष्टपणे सांगितलं की, "अशा पापांचं कोणतेही स्पष्टीकरण नसतं, एकतर प्रायश्चित्त होईल किंवा दंड मिळेल."

"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू

"१० वर्षांच्या नवसानंतर मुलगा झाला होता, पण..."; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

"तुमचं काही चालत नव्हतं असं कोण म्हणतंय? जेव्हा जनता घाण पाणी पीत होती, तेव्हा तुम्ही पदावर बसून बिसलेरी का पीत राहिलात? आयुष्याची किंमत २ लाख रुपये नसते. ही मोहन यादव यांची परीक्षेची वेळ आहे. खालपासून वरपर्यंतच्या सर्व गुन्हेगारांना जास्तीत जास्त दंड द्यावा लागेल. देशातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळवणाऱ्या शहरात विषारी पाणी मिळणं, हे संपूर्ण व्यवस्थेसाठी लाजिरवाणं आणि अत्यंत कलंकित करणारं" असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

"पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल

इंदूरच्या भागीरथपुरा भागात दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूमुळे आता राजकारण तापलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या घटनेला 'जगण्याच्या अधिकाराची हत्या' म्हटलं आहे. राहुल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहन यादव सरकारवर हल्लाबोल करताना म्हटलं की, "इंदूरमध्ये पाणी नाही, तर विष वाटलं गेलं आणि प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत होतं. घराघरात शोककळा पसरली आहे, गरीब हतबल आहेत आणि अशातच भाजपा नेत्यांची अहंकारी विधानं येत आहेत. ज्यांच्या घरात दु:ख आहे, त्यांना सांत्वन हवं होतं, मात्र सरकारने त्यांना अहंकार दिला."

English
हिंदी सारांश
Web Title : Uma Bharti Slams BJP Over Indore Water Tragedy; Calls it Shameful

Web Summary : Uma Bharti criticized her own party over Indore's contaminated water deaths, calling it shameful. She demanded accountability and stricter penalties for those responsible, emphasizing that lives are worth more than compensation offered. Rahul Gandhi also attacked the government.
टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाWaterपाणी