शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

...अन् असा सुरू झाला #Cancel10thICSEBoards हॅशटॅग, 25 हजारांहून अधिक ट्विट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 16:29 IST

सोशल मीडियावर एखादी गोष्ट झटपट व्हायरल होते. नवनवीन ट्रेंड्स हे सातत्याने येत असतात. गेल्या काही दिवसांपासून #Cancel10thICSEBoards हा ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकांच्या परीक्षा रखडल्याने त्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याच दरम्यान ट्विटरवर सध्या Cancel10thICSEBoards हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. 

सोशल मीडियावर एखादी गोष्ट झटपट व्हायरल होते. नवनवीन ट्रेंड्स हे सातत्याने येत असतात. गेल्या काही दिवसांपासून #Cancel10thICSEBoards हा ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा 2 जुलै ते 14 जुलैदरम्यान घेण्याचा निर्णय आयसीएसई बोर्डाने घेतला. या निर्णयाला पालकांनी विरोध केला आहे. आयसीएसई बोर्ड परीक्षा रद्द करत नसल्याने पालकांनी ट्विटरवर #Cancel10thICSEBoards अंतर्गत परीक्षा रद्द करण्याबाबत एक मोहीम सुरू केली आहे. ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करत अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विटरवर आतापर्यंत तब्बल 25,000 हून अधिक लोकांनी #Cancel10thICSEBoards वापरला आहे.

आयसीएसई बोर्डाने परीक्षा रद्द कराव्यात, विद्यार्थ्यांच्या आवाज देशभरात पोहोचावा म्हणून Cancel10thICSEBoards हे ऑनलाईन कॅम्पेन सुरू करण्यात आलं आहे.  यासंदर्भात WhatsApp ग्रुप तयार करण्यात आले असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे जेणेकरून परीक्षा रद्द केल्या जातील. 'परीक्षेपेक्षा मुलं जास्त महत्त्वाची आहेत. कोरोनाच्या काळात परीक्षा रद्द करा' अशी एकच मागणी सर्वांनी केली आहे. 'दहावीची परीक्षा ही मुलांच्या आयुष्याला कलाटणी देणारी असते मात्र यासाठी आम्ही आमच्या मुलांचा जीव पणाला लावू शकत नाही' असं अनेक पालकांनी म्हटलं आहे. तसेच परीक्षा आणि निकाल हे येतच असतात पण कोरोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर काय करणार... तो परत येणार आहे का? असा संतप्त सवाल अनेकांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे. 

विद्यार्थ्यांसह अनेक पालकांनी परीक्षेबाबतचं आपलं मत मांडलं आहे. तसेच दिल्ली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, शिक्षणमंत्र्यांना, लोकप्रिय न्यूज चॅनेलला देखील टॅग केलं आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा जुलैमध्ये घेण्याच्या आयसीएसईच्या निर्णयाला एका वकिलाने मुंबई अरविंद तिवारी यांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली असून विद्यार्थी आणि पालकांची बाजू मांडली आहे. 

पालकांनी याबाबत पंतप्रधान कार्यालय व एचआरडी मंत्रालयाकडे तक्रार केली. मात्र, आयसीएसई हे खासगी बोर्ड असल्याने आपण यात हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे याबाबत बोर्डाशीच चर्चा करावी, असे पंतप्रधान कार्यालयातून कळविण्यात आले. त्यामुळे न्यायालयात धाव घेण्याशिवाय पर्याय उरला नाही, असे तिवारी यांनी याचिकेत म्हटले आहे. मुंबईसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बोर्ड विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालत आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात यावी व लवकर निकाल लावावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यास विलंब होणार नाही, त्यासाठी या याचिकेवर तत्काळ सुनावणी घ्यावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीssc examदहावीHigh Courtउच्च न्यायालयSchoolशाळाTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया