शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

मुलांनीच जन्मदात्या आईला जीवंत संपवलं; झाडाला बांधून पेटवलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 09:35 IST

त्रिपुरा येथे एका ६२ वर्षीय महिलेला तिच्या मुलांनी झाडाला बांधून जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Tripura Crime : पश्चिम त्रिपुरातून एक हादरवणारा गुन्हा उघडकीस आला आहे. त्रिपुरा येथे एका ६२ वर्षीय महिलेला तिच्या मुलांनी आणि कुटुंबीयांनी झाडाला बांधून पेटवून दिले. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. आरोपी मुलांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक वादातून हा गुन्हा घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

त्रिपुरामध्ये मुलांनी आईची निर्घृण हत्या केली. पश्चिम त्रिपुरामध्ये एका ६२ वर्षीय महिलेला तिच्या दोन मुलांनी झाडाला बांधून जिवंत जाळले. पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री चंपकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंबरबारीत घडली. महिलेच्या पतीचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे ही महिला तिच्या दोन मुलांसह राहत होती. तिचा दुसरा मुलगा आगरतळा येथे राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेला जिवंत जाळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि झाडाला बांधलेला जळालेला मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. "आम्ही महिलेच्या दोन मुलांना त्यांच्या कथित गुन्ह्यासाठी अटक केली आहे. दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार असून पुढील चौकशीसाठी त्याला पोलीस कोठडीत पाठवण्याची विनंती करण्यात येणार आहे. तसेच या घटनेमागे कौटुंबिक वाद हे कारण असू शकते," असे जिरानियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कमलकृष्ण कोलोई यांनी सांगितले.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात रविवारी एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी त्याचे वडील आणि भावांसह आठ जणांना अटक केली. ही घटना गेल्या गुरुवारी रात्री पोलिस स्टेशन हद्दीतील खर्गापूर खोरी गावात घडली होती. या गावातील रहिवासी कैलाशनाथ शुक्ला यांनी त्यांचा मुलगा विनोद शुक्ला याला एका कार्यक्रमाच्या बहाण्याने घरी बोलावले होते. त्यावेळी जमिनीच्या वादातून त्यांनी आणि त्याच्या पाच मुलांनी विनोदवर हल्ला करून त्याची हत्या केली. विनोदच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी १४ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विनोदच्या मृत्यूची बातमी कळताच कैलास आणि त्याची पाच मुले फरार झाली. 

टॅग्स :Tripuraत्रिपुराCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस