शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुलांनीच जन्मदात्या आईला जीवंत संपवलं; झाडाला बांधून पेटवलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 09:35 IST

त्रिपुरा येथे एका ६२ वर्षीय महिलेला तिच्या मुलांनी झाडाला बांधून जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Tripura Crime : पश्चिम त्रिपुरातून एक हादरवणारा गुन्हा उघडकीस आला आहे. त्रिपुरा येथे एका ६२ वर्षीय महिलेला तिच्या मुलांनी आणि कुटुंबीयांनी झाडाला बांधून पेटवून दिले. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. आरोपी मुलांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक वादातून हा गुन्हा घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

त्रिपुरामध्ये मुलांनी आईची निर्घृण हत्या केली. पश्चिम त्रिपुरामध्ये एका ६२ वर्षीय महिलेला तिच्या दोन मुलांनी झाडाला बांधून जिवंत जाळले. पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री चंपकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंबरबारीत घडली. महिलेच्या पतीचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे ही महिला तिच्या दोन मुलांसह राहत होती. तिचा दुसरा मुलगा आगरतळा येथे राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेला जिवंत जाळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि झाडाला बांधलेला जळालेला मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. "आम्ही महिलेच्या दोन मुलांना त्यांच्या कथित गुन्ह्यासाठी अटक केली आहे. दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार असून पुढील चौकशीसाठी त्याला पोलीस कोठडीत पाठवण्याची विनंती करण्यात येणार आहे. तसेच या घटनेमागे कौटुंबिक वाद हे कारण असू शकते," असे जिरानियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कमलकृष्ण कोलोई यांनी सांगितले.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात रविवारी एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी त्याचे वडील आणि भावांसह आठ जणांना अटक केली. ही घटना गेल्या गुरुवारी रात्री पोलिस स्टेशन हद्दीतील खर्गापूर खोरी गावात घडली होती. या गावातील रहिवासी कैलाशनाथ शुक्ला यांनी त्यांचा मुलगा विनोद शुक्ला याला एका कार्यक्रमाच्या बहाण्याने घरी बोलावले होते. त्यावेळी जमिनीच्या वादातून त्यांनी आणि त्याच्या पाच मुलांनी विनोदवर हल्ला करून त्याची हत्या केली. विनोदच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी १४ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विनोदच्या मृत्यूची बातमी कळताच कैलास आणि त्याची पाच मुले फरार झाली. 

टॅग्स :Tripuraत्रिपुराCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस