शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

Triple Talaq Bill: 'रामानेही सीतेला सोडलं होतं, मग इस्लामलाच लक्ष्य का करता?'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 11:38 AM

Triple Talaq Bill: तिहेरी तलाकबाबतचं सुधारित विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

नवी दिल्लीः बहुचर्चित तिहेरी तलाकविरोधी विधेयकाचं राज्यसभेत काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी वेगळ्याच वादाला तोंड फोडलं आहे. 'सर्वच धर्मांमध्ये स्त्रियांना कमी-अधिक फरकाने अन्याय्य वागणूक दिली जाते. रामायणात श्रीरामानेही सीतेवर संशय घेऊन तिला सोडलं होतं. याचाच अर्थ, सर्व धर्मांमध्ये पुरुषांचं वर्चस्व पाहायला मिळतं. मग फक्त मुस्लिम धर्मातील रुढींवर बोट का ठेवलं जातंय?, असा प्रश्न हुसेन दलवाई यांनी उपस्थित केला आहे. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे तिहेरी तलाकबाबतचं सुधारित विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विधेयक मंजूर न झाल्यास या संदर्भात अध्यादेश काढण्याची तयारीही नरेंद्र मोदी सरकारने केल्याचं कळतं. या पार्श्वभूमीवरच, काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी या प्रकरणात प्रभू रामचंद्रांना ओढल्याने त्यावरून 'रामायण' होऊ शकतं.  

तिहेरी तलाक पद्धत गुन्ह्याच्या चौकटीत आणणारं 'मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक' डिसेंबर महिन्यात लोकसभेत मंजूर झालं होतं. परंतु, या विधेयकातील काही तरतुदींवर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. तिहेरी तलाक हा अजामीनपात्र गुन्हा असू नये, तलाक देणाऱ्या पतीला ३ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद बदलावी, अशी मतं विरोधकांनी मांडली होती.  मोदी सरकारकडे राज्यसभेत बहुमत नसल्यानं हे विधेयक वरिष्ठ सभागृहात अडलं होतं. या अधिवेशनात हे विधेयक मंजूर करून घेण्याच्या दृष्टीने, सरकारने थोडी मवाळ भूमिका घेत काही तरतुदींमध्ये सुधारणा केली आहे.

मूळ विधेयकात तीन प्रमुख दुरुस्त्या प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, तिहेरी तलाक देणे हा गुन्हा अजामीनपात्र म्हणूनच कायम ठेवला असला, तरी योग्य प्रकरणात दंडाधिकारी आरोपीला जामीन देऊ शकतील. तसंच, पती आणि पत्नीमध्ये समेट झाल्यास दंडाधिकारी सुयोग्य अटींवर प्रकरण बंदही करू शकतील. त्याशिवाय, पत्नीने किंवा कुटुंबातील सदस्याने तक्रार नोंदवली तरच पोलीस गुन्ह्याची दखल घेणार आहेत. 

तिसऱ्या सुधारणेनुसार, महिलेला आपल्या मुलाचा ताबा आणि स्वतःसह मुलासाठी पोटगी मागण्याचा अधिकारही देण्यात आला आहे. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यास लोकसभेत परत पाठवलं जाईल आणि त्यातील सुधारणा संमत करून घेतल्या जातील. 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकRajya Sabhaराज्यसभाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस