शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

तृणमूलचे कुणाल घोष यांचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: November 15, 2014 02:05 IST

तृणमूलचे निलंबित खासदार आणि शारदा घोटाळ्यातील आरोपी कुणाल घोष यांनी शुक्रवारी प्रेसिडेन्सी सुधारगृहात झोपेच्या गोळ्या सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली.

कोलकाता : तृणमूलचे निलंबित खासदार आणि शारदा घोटाळ्यातील आरोपी कुणाल घोष यांनी शुक्रवारी प्रेसिडेन्सी सुधारगृहात झोपेच्या गोळ्या सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. गेल्यावर्षी अटक झाल्यापासून त्यांना या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्यांना सरकारी एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
 घोष यांनी भर न्यायालयात शारदा घोटाळ्यात सहभागी लोकांवर सीबीआयने कारवाई न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती दिली आहे, खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयातच ठेवल्याचे प. बंगालच्या सुधारगृह सेवामंत्री एच. ए. स्वाफी यांनी सांगितले. त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून पाळत ठेवली जात होती. ते झोपण्यापूर्वी आम्ही तपासणी केली होती. त्यांच्याकडे झोपेच्या गोळ्या किंवा अन्य अपायकारक पदार्थ आढळले नव्हते. शुक्रवारी पहाटे त्यांनी श्वास घेण्याला त्रस होत असल्याची तक्रार करतानाच झोपेच्या गोळ्या खाल्ल्याची कबुली दिली होती. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांची प्रकृती सामान्य आढळून आली. असे वरिष्ठ अधिका:याने सांगितले.
विरोधकांचा हल्लाबोल..
घोष यांनी खुल्या न्यायालयात आत्महत्येची धमकी दिली असताना राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना का केल्या नाहीत, असा सवाल करीत प. बंगालच्या विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. घोष यांनी मरण पत्करावे, असे सरकारला वाटत असावे, असा टोला प. बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांनी लगावला.  
सीबीआय चौकशी करा
शारदा घोटाळ्यातील पुरावे नष्ट करण्याचा हा राजकीय कट आहे, घोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याची सीबीआयकडून चौकशी केली जावी, असे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सिद्धार्थनाथ सिंग यांनी म्हटले आहे. घोष हे मुख्य साक्षीदार असल्यामुळे त्यांच्यावर 24 तास निगराणी ठेवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
 
कर्मचारी निलंबित
प्रेसिडेन्सी सुधारगृहाचे कारागृह अधीक्षक, कारागृह डॉक्टर आणि तैनात कर्मचा:यांना चौकशी पूर्ण होईर्पयत निलंबित ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत केली. गृहसचिव वासुदेव बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील समिती या प्रकरणी चौकशी करील, असे त्यांनी स्पष्ट केले.