शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

पारदर्शक कारभारामुळे माहिती अधिकार कायद्याची यापुढे गरजच भासणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 4:34 AM

नवी दिल्ली : सरकारचे कामकाज पारदर्शकतेने चालावे असाच आमचा प्रयत्न असून, तसे पूर्णपणे शक्य झाल्यास माहितीच्या अधिकार कायद्याचा वापर ...

नवी दिल्ली : सरकारचे कामकाज पारदर्शकतेने चालावे असाच आमचा प्रयत्न असून, तसे पूर्णपणे शक्य झाल्यास माहितीच्या अधिकार कायद्याचा वापर आपोआप कमी होईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी येथे केले.

केंद्रीय माहिती आयोगाच्या १४ व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन गृहमंत्र्यांनी केले. ते म्हणाले की, सरकारने घेतलेले निर्णय असोत की, कोणत्याची सरकारी कार्यालयांतील माहिती असो, ती आपोआप लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. ती आपोआप लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारच्या प्रत्येक मंत्रालयाचे काम पारदर्शकपणे चालायला हवे.सरकारी कामकाजात ती पारदर्शकता आणायला आम्ही सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांना माहितीच्या अधिकाराचा कायदा वापरण्याची गरजच भासणार नाही.

जनता आणि सरकार यांच्यात प्रचंड दरी असल्याने या कायद्याची गरज निर्माण झाली आणि तो २00५ साली करण्यात आला; पण आता ती दरी बुजवण्यासाठी केंद्र सरकारने पावले टाकायला सुरुवात केली आहे. लोकांना आता सरकारविषयी पारदर्शक कारभारामुळेच विश्वास निर्माण झाला आहे. याही पुढे जाऊ न माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा वापर करावाच लागू नये, अशी व्यवस्था आम्ही निर्माण करीत आहोत, असे ते म्हणाले.

सरकारच्या पारदर्शक कारभारामुळे अनियमितता, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार यांना आळा बसू लागला आहे. प्रशासनही आता वेगाने काम करू लागले आहे. त्याचे चांगले परिणाम जनतेला पाहायला मिळत आहेत, असा दावाही गृहमंत्र्यांनी केला.

सरकार स्वत: सर्व माहिती जनतेपर्यंत पोहोचवेनच्कोणत्याही सरकारचे यश माहितीच्या अधिकाराखाली किती अर्ज दाखल होतात, यावर अवलंबून नसते.च्जेव्हा माहिती सहजासहजी मिळेनाशी होते, तेव्हाच लोकांना माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा वापर करावा लागतो, असे सांगून अमित शाहा म्हणाले की, आमचे सरकार स्वत:हूनच सर्व माहिती जनतेपर्यंत पोहोचवेन, या पद्धतीने काम करीत आहे. त्यामुळे आरटीआयखालील अर्ज आपोआप कमी कमी होत जातील.

टॅग्स :Amit Shahअमित शहा