काळाचा घाला! लग्नाची वरात सासरी पोहोचण्यापूर्वीच नववधूचा मृत्यू, नवरदेवाची मृत्यूशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:27 IST2025-05-30T16:22:57+5:302025-05-30T16:27:21+5:30
Accident : ज्या मुलीला सून म्हणून घरी आणणार होते, तिच्यावरच अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ या कुटुंबावर आली आहे.

काळाचा घाला! लग्नाची वरात सासरी पोहोचण्यापूर्वीच नववधूचा मृत्यू, नवरदेवाची मृत्यूशी झुंज
लग्नाची वरात घेऊन घरी निघालेल्या गाडीचा अपघात झाल्याने नववधूचे दुर्दैवी निधन झाले आहे, तर नवरदेव गंभीर जखमी झाला आहे. ही दुःखद घटना बिहारच्या भोजपूरमध्ये घडली आहे. लग्नानंतर नवरा-नवरी घरी परतत असताना हा अपघात घडला आहे. या अपघातात नवरीचा जागीच मृत्यू झाला असून, नवरा मृत्यूशी झुंज देत आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिल्याने हा अपघात घडला.
नुकतंच लग्न आणि इतर सोहळे आटोपून नववधू आणि वरासह कुटुंब आपल्या घरी परतत होते. नवरा-नवरीसोबतच या गाडीत आणखी ७ लोक देखील होते. घरी परतत असताना त्यांच्या गाडीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीतील सगळेच गंभीर जखमी झाले. सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान नववधूची प्रकृती गंभीर झाली आणि तिचा मृत्यू झाला. तर, नवऱ्याची प्रकृती अद्याप गंभीर आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरात वरात येण्याऐवजी अंत्ययात्र निघल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
धुमधडाक्यात पार पडले लग्न!
बिहारमधील भोजपुर येथील सिकरहटामधील रंजमलदिह या गावात ही घटना घडली आहे. या गावात राहणारे ओम प्रकाश सिंह यांचा मुलगा मोनू कुमार याचे लग्न हसन बाजारमधील इनरपतपूर गावातील दूधनाथ सिंह यांची मुलगी ललिता हिच्याशी ठरले होते. २८ मे रोजी दोघांचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. लग्नसोहळा उरकून हे कुटुंब आपल्या गावी परतत होते, तेव्हा वाटेतच हा मोठा अपघात झाला.
कुटुंबावर शोककळा
नवरा-नवरीची गाडी सिकरौलजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. ही टक्कर इतकी भयानक होती की, गाडीतील सातही लोक जखमी झाले. तर, उपचारादरम्यान नवरीने अखेरचा श्वास घेतला. ज्या मुलीला सून म्हणून घरी आणणार होते,तिच्यावरच अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ या कुटुंबावर आली आहे.