शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

...तेव्हा वाजपेंयींनी मेंढ्या-बकऱ्यांच्या माध्यमातून घडवली होती चीनला अद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 1:37 PM

एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी यांनी तोंडातून एकही शब्द न काढता विस्तारवादी चीनची फजिती केली होती. या फजितीमुळे तीळपापड झालेल्या चीनने तत्कालीन पंतप्रधानांना पत्र लिहून हा आपला अपमान असल्याचा दावा केला होता.  

ठळक मुद्दे१९६५ च्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यादरम्यान, चीनने भारतीय सैनिकांनी आपल्या बकऱ्या आणि याक चोरल्याचा आरोप केलाचीनच्या या आरोपाला वाजपेयींनी आपल्या कृतीच्या माध्यमातून सणसणीत उत्तर दिले होतेतेव्हा विरोधी पक्षात असलेल्या वाजपेयींनी ८०० बकऱ्यांची व्यवस्था केली आणि दिल्लीतील चिनी दूतावास गाठला

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेली हिंसक झटापट आणि दोन्ही देशांचे लष्कर सध्या समोरासमोर येऊन उभे टाकल्याने प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या जगभरात झालेला कोरोनाचा फैलाव आणि चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे जगातील अनेक देश चीनवर नाराज आहेत. मात्र थोडीफार आक्रमक विधाने वगळता कुठलाही देश चीनविरोधात आक्रमक झालेला दिसत नाही. आपल्या देशातूनही सध्या चीनविरोधात आक्रमक वक्तव्ये होत आहेत. मात्र एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी यांनी तोंडातून एकही शब्द न काढता विस्तारवादी चीनची फजिती केली होती. या फजितीमुळे तीळपापड झालेल्या चीनने तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींना पत्र लिहून हा आपला अपमान असल्याचा दावा केला होता.  

त्याचे झाले असे होते की, १९६२ च्या युद्धानंतर चीन भारताच्या वारंवार कुरापती काढत होता. त्यासाठी चीनकडून वेगवेगळे आरोपही करण्यात येत होते. त्यातच १९६५ च्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यादरम्यान, चीनने भारतीय सैनिकांनी आपल्या बकऱ्या आणि याक चोरल्याचा आरोप केला होता. याबाबत चीन सरकारने भारत सरकारला पत्र लिहून भारतीय सैनिकांनी आपल्या ८०० बकऱ्या आणि ५९ याक चोरल्याचा आरोप केला.

 एकीकडे भारतीय लष्कर पाकिस्तानसोबत लढाईत गुंतले होते. तर दुसरीकडे चीन सिक्कीममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होते, अशा त्या काळात भारत सरकारने हा आरोप फेटाळला.  मात्र चीनच्या या आरोपाला वाजपेयींनी आपल्या कृतीच्या माध्यमातून सणसणीत उत्तर दिले होते. वाजपेयी तेव्हा जनसंघाचे नेते होते. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या वाजपेयींनी ८०० बकऱ्यांची व्यवस्था केली आणि दिल्लीतील चिनी दूतावास गाठला. या बकऱ्यांच्या शरीरावर आम्हाला खा पण जगाला वाचवा, असे उपहासात्मक पत्रही लावले होते. दरम्यान, वाजपेयींच्या या कृतीची तेव्हा खूप चर्चा झाली. भारत सरकारनेही यावरून चीनला खरमरीत उत्तर दिले. दिल्लीमध्ये कुणीतरी ८०० बोकडांचा मोर्चा काढला. मात्र भारत सरकारचा याच्याशी संबंध नाही, कुठल्याही मुद्द्यावरून भारताला युद्धाची धमकी देणाऱ्या चीनविरोधात भारताच्या नागरिकांनी शांततापूर्ण आणि विनोदी मार्गाने दिलेली प्रतिक्रिया  आहे, असे सरकारने चीनला सांगितले.

मात्र या सर्व प्रकारामुळे चीनचा अपमान झाल्याचा दावा चीनकडून करण्यात आला. पण त्यात चीनचेच हसे झाले. या घटनेनंतर चीनने सिक्कीममधील नथू ला येथे भारताविरोधात आगळीक केली होती. मात्र त्याला भारतीय लष्कराने सणसणीत उत्तर देऊन चिनी सैनिकांना पिटाळून लावले होते.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीIndiaभारतchinaचीनLal Bahadur Shastriलाल बहादूर शास्त्री