शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
2
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
3
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
4
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
5
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
6
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
7
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: एटीएममधून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
8
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
9
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
10
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
11
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
12
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
13
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
14
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
15
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
16
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
17
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
18
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
19
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
20
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी

ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 8:32 PM

शहा म्हणाले, काँग्रेस म्हणते की मोदी आरक्षण संपवतील. मात्र, गेल्या 10 वर्षांपासून पूर्ण बहुमताने सत्तेत असतानाही त्यांनी असे काहीही केले नाही. पण, तेलंगणात काँग्रेसने मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देऊन अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहोचवला आहे.

संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबरकसून मैदानात उतरलेले आहेत. प्रचारादरम्यान नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता भारतीय जनता पक्षाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. "2024 ची लोकसभा निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे. यात सामना 'विकासासाठी मत' आणि ‘जिहादसाठी मत’ असा आहे. एवढेच नाही, तर ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘भारतीय गॅरंटी’ आणि राहुल गांधी यांची ‘चिनी गॅरंटी’ यात आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. ते गुरुवारी तेलंगणातील भोनगीर लोकसभा मतदारसंघात एका प्रचार सभेला संबोधित करत होते. 

काँग्रेस, भारत राष्ट्र समिती (BRS) आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लीमीन (AIMIM) यांना 'तुष्टीकरणाचे त्रिकूट' संबोधत शाह म्हणाले, "हे पक्ष रामनवमीच्या मिरवणुका काढू देत नाहीत, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) विरोध करतात आणि हैदराबाद मुक्ती दिनही (17 सप्टेंबर) साजरा करू देत नाहीत. शरियत आणि कुराणच्या आधारे तेलंगण चालवण्याची यांची इच्छा आहे."

आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांत भाजप सुमारे 200 जागा जिंकेल, असा दावाही यावेळी शाह यांनी केला. ते म्हणाले, "पक्षाला 400 जागांचे लक्ष्य पार करण्यासाठी तेलंगणाला मतदान करावे लागेल. 2019 मध्ये तेलंगणातील लोकसभेच्या 17 पैकी चार जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता या निवडणुकीत भाजप 10 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल हे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी समजून घ्यायला हवे. तेलंगणातील दोन अंकी जागा पंतप्रधान मोदींना 400 पार घेऊन जाईल."

शहा म्हणाले, काँग्रेस म्हणते की मोदी आरक्षण संपवतील. मात्र, गेल्या 10 वर्षांपासून पूर्ण बहुमताने सत्तेत असतानाही त्यांनी असे काहीही केले नाही. पण, तेलंगणात काँग्रेसने मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देऊन अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहोचवला आहे. भाजप सत्तेत आल्यास मुस्लिम आरक्षण संपवेल आणि एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण वाढवेल. मोदी जे बोलतात ते करतात. राहुलबाबांची गॅरंटी सूर्यास्तापर्यंतही टिकत नाही."

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेसTelanganaतेलंगणा