शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

'शेतकऱ्यांच्या मृत्यूची कोणतीही नोंद नाही, नुकसान भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही'; कृषी मंत्र्यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 12:03 PM

हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवसही विरोधकांच्या गोंधळातच सुरू झाला.

नवी दिल्ली:संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. दोन्ही सभागृहात तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाची सुरुवातही जोरदार गदारोळात झाली. विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच लोकसभेचे कामकाजही दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेच्या 12 खासदारांच्या निलंबनावरुन विरोधी पक्षांमध्ये नाराजी आहे. हे निलंबन रद्द करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. निलंबित खासदारांनी माफी मागावी, असं सभापतींनी बोलले असले तरी विरोधक त्यासाठी तयार नाहीत.

'मृत्यूची नोंद कृषी मंत्रालयाकडे नाही'

दरम्यान, कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या आंदोलनात शेतकऱ्यांचा मृत्यू आणि नुकसान भरपाईबाबत सरकारने मंगळवारी संसदेत प्रतिक्रिया दिली. सरकारकडे असा काही डेटा आहे का, ज्यामध्ये पीडित कुटुंबांचा उल्लेख असेल किंवा त्यांना मदत करण्याचा काही प्रस्ताव असेल ? असा प्रश्न विरोधकांनी सरकारला विचारला होता. यावर कृषी मंत्री नरेंद्र तोमर म्हणाले की, कृषी मंत्रालयाकडे मृत्यूची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही.

गांधी पुतळ्याजवळ विरोधकांची निदर्शने

आजचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी खासदारांच्या निलंबनाला विरोध केला. संसदेतील महात्मा गांधी पुतळ्यासमोर विरोधकांनी निदर्शने केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आम्ही राज्यसभेतील 12 विरोधी सदस्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी करत आहोत. आम्ही बैठक घेऊन पुढील कृती ठरवू. 

टीएमसी खासदार सौगता रॉय म्हणाल्या - 12 निलंबित खासदारांना माफी मागण्यास सांगितले आहे, पण विरोधक माफी मागतील असे मला वाटत नाही. 12 खासदारांपैकी 2 खासदार तृणमूलचे आहेत, तृणमूल माफी मागण्याच्या विरोधात आहे. तृणमूलचे दोन्ही खासदार गांधी पुतळ्यासमोर धरणे धरत बसले असून हे धरणे सुरूच राहणार आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनParliamentसंसदcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिकाBJPभाजपा