शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

'पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची गरज भासू शकते'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 6:04 PM

पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये होत असलेला हिंसाचार पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज भासू शकते असं राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. यामुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हं आहेत. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. यावरुन तृणमूल काँग्रेस आणि भाजपानं एकमेकांवर आरोप केले. या पार्श्वभूमीवर राज्यपाल त्रिपाठी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. पश्चिम बंगालमधील सद्यस्थितीची माहिती मोदी आणि शहांना दिल्याचं त्रिपाठींनी 'इंडिया टुडे' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. राज्यातील परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज भासू शकते असंदेखील ते पुढे म्हणाले. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात पाच कार्यकर्ते मृत्यूमुखी पडल्याचा दावा भाजपा नेतृत्त्वाकडून करण्यात आला. तर सहा कार्यकर्ते बेपत्ता झाल्याचा दावा तृणमूल काँग्रेसनं केला. त्यामुळे राज्यातील परिस्थिती चिघळली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये प्रचंड हिंसाचार झाला. निवडणूक निकालानंतरही राज्यातील हिंसाचार थांबलेला नाही. निकालानंतरच्या हिंसाचारात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याचं त्रिपाठींनी सांगितलं. केंद्रीय गृह मंत्रालयानं दिलेल्या सूचना राज्य सरकारकडून फेटाळण्यात आल्या आहेत. याबद्दलच्या प्रश्नावरदेखील त्रिपाठींनी भाष्य केलं. केंद्र सरकारला सूचना देण्याचा अधिकार आहे आणि त्या सूचना स्वीकाराच्या की नाहीत हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. यामध्ये माझी कोणतीही भूमिका नाही, असं राज्यपाल त्रिपाठी यांनी म्हटलं.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा