शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

... तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप होईल, योगी सरकारबद्दल भाजपा आमदारच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 13:23 IST

एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार, उत्तर प्रदेश सरकारच्या कामकाजात आमदारांची काहीच भूमिका नाही. आमदारांच्या सूचनांकडे कुणीही लक्ष देत नाही. राठौर हे सितापूरचे आमदार आहेत

ठळक मुद्देराठौर यांनी यापूर्वीही उत्तर प्रदेशमधील योगी सरकार आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध स्पष्टपणे आपली भूमिका मांडली होती. गतवर्षी एप्रिल महिन्यात कथितप्रकरणात त्यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती.

मुंबई - उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार राकेश राठौर आपल्या पक्षाच्या सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कोरोना परिस्थितीवरुन उत्तर प्रदेश सरकारवर त्यांनी टीका केलीय. तसेच, अधिक बोलायला आपण घाबरतो, कारण त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशा शब्दात उत्तर प्रदेशातील आमदाराने राज्य सरकारवरच्या दडपशाहीबद्दल भावना व्यक्त केली आहे. 

एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार, उत्तर प्रदेश सरकारच्या कामकाजात आमदारांची काहीच भूमिका नाही. आमदारांच्या सूचनांकडे कुणीही लक्ष देत नाही. राठौर हे सितापूरचे आमदार आहेत. मी अनेकदा आवाज उठवला आहे, पण आमदारांची लायकी काय, मी जास्त बोललो तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप लावला जाऊ शकतो. सितापूरमधील एका सरकारी रुग्णालयातील ट्रामा सेंटरबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राठौर यांनी योगी सरकारवरच टीका केली. 

राठौर यांनी यापूर्वीही उत्तर प्रदेशमधील योगी सरकार आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध स्पष्टपणे आपली भूमिका मांडली होती. गतवर्षी एप्रिल महिन्यात कथितप्रकरणात त्यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यानंतर, भाजपाने त्यांना नोटीस बजावली होती. टाळी वाजवून कोरोना पळवून लावता येईल का? शंख वाजवून कोरोना पळून जाईल का? आपण मूर्खपणाचे रेकॉर्ड तोडत आहोत. आपल्यासारखे लोकं मूर्ख आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टाळी वाजविण्याच्या आवाहनावर राठौर यांनी प्रतिक्रिया दिली होती. 

आरोग्य व्यवस्था रामभरोसे

अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने योगी सरकारला धारेवर धरले. न्या. अजित कुमार आणि न्या. सिद्धार्थ वर्मा यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने योगी सरकारला पाच सूचना केल्या आहेत. उत्तर प्रदेशातील छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे असल्याचे सांगत योगी सरकारला फटकारले.

उच्च न्यायालयाने केल्या ५ सूचना 

अलाहाबाद उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने योगी सरकारला कोरोनाच्या परिस्थितीत लढण्यासाठी ५ सूचनावजा सल्ले दिले आहेत. एक म्हणजे बड्या औद्योगिक घराण्यांकडून करण्यात येणाऱ्या दानाची रक्कम वा फंड कोरोनाची लस खरेदीसाठी वापरावा. दुसरे म्हणजे बीएचयू वाराणसीसह गोरखपूर, प्रयागराज, आग्रा, मेरठ येथील ४ मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधा वाढवाव्यात. २२ मेपर्यंत याचा अपग्रेडेशन प्लान न्यायालयाला सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारyogi adityanathयोगी आदित्यनाथGovernmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या