शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
2
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
3
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
4
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
5
"कृपया, माझे पैसे द्या...", तान्या मित्तलने ८०० साड्यांचं पेमेंट बुडवलं? स्टायलिस्टचा गंभीर आरोप
6
TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर
7
पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास
8
'अमित शाह घाबरले, त्यांचे हातही थरथरत होते...', राहुल गांधींचा गृहमंत्र्यांवर निशाणा
9
डेट फंड्सकडे गुंतवणूकदारांची पाठ! महिन्यात २५,६९२ कोटी काढले, 'या' योजनेला सर्वाधिक पसंती
10
करण जोहरची 'धुरंधर'वर प्रतिक्रिया, रणवीर सिंह अन् दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाला...
11
Arunachal Pradesh Accident: अरुणाचल प्रदेशात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला, १७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
IPO पूर्वी झुनझुनवाला कुटुंबानं 'या' कंपनीत केली ₹१०० कोटींची गुंतवणूक, अन्य २५ दिग्गजांनीचीही इनव्हेस्टमेंट
13
नवीन कामगार कायद्यांमुळे हातात येणारा पगार खरंच कमी होणार?; कामगार मंत्रालयाचा महत्त्वाचा खुलासा, सगळं गणित समजावलं
14
रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या पगारात होणार मोठी घट; शुभमन गिलला मिळणार 'बंपर फायदा'?
15
पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर १४०० कोटींचा भूसंपादन घोटाळा ! भाजपा- शिंदे सेनेच्या नेत्यांवर सुषमा अंधारेंच्या आरोपांनी खळबळ
16
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
17
Western Overseas Study Abroad IPO: पहिल्याच दिवशी IPO नं दिला झटका, आपटून ५२ रुपयांवर आला; लागलं लोअर सर्किट
18
Travel : दुबई स्वप्ननगरी! किती खर्चात होईल ५ दिवसांची शाही सफर; वाचा संपूर्ण बजेट आणि जाणून घ्या व्हिसाबद्दल..
19
Relationship Tips: बायकोला खुश कसे ठेवावे? प्रेमानंद महाराज म्हणाले, 'मी यात तज्ज्ञ नाही पण...'
20
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! BoAt कंपनीच्या कारभारात गंभीर त्रुटी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड
Daily Top 2Weekly Top 5

"विशाळगडावरील दंगल हिंदुत्ववाद्यांनी कुणाच्या चिथावणीवरून केली? सरकारनं खुलासा करावा", काँग्रेसची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 16:00 IST

Vishalgad News : काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विशाळगड येथे झालेल्या तोडफोडीवरून राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. विशाळगडावरील दंगल हिंदुत्ववाद्यांनी कुणाच्या चिथावणीवरून केली, याच्यामागे कोण आहे, याचा खुलासा राज्य सरकारने करावा अशी मागणी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली. 

विशाळगडावरील अतिक्रमणांचा वाद मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात चिघळला आहे. तसेच यादरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमणांवर आक्रमण करत शिवभक्तांनी रविवारी मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली होती. त्यामुळे कोल्हापूरसह राज्यातील राजकारण सध्या तापलेलं आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विशाळगड येथे झालेल्या तोडफोडीवरून राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. विशाळगडावरील दंगल हिंदुत्ववाद्यांनी कुणाच्या चिथावणीवरून केली, याच्यामागे कोण आहे, याचा खुलासा राज्य सरकारने करावा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. 

विशाळगडावरील दंगलीबाबत प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ही दंगल मुळात हिंदुत्ववाद्यांनी कुणाच्या चिथावणीवरून केली. याच्यामागे कोण आहे? याच्यावर काय कारवाई होणार आहे, याचा खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये जे जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मागच्या काही दिवसांत महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे जे धिंडवडे निघाले आहेत, त्याला राज्य सकरार जबाबदार आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.  

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून, ज्या मशिदीच्या ठिकाणी हा वाद उदभवला आणि ज्या पद्धतीने याला हिंसक स्वरूप मिळालं, तसेच विशिष्ट्य समाजातील लोकांना लक्ष्य करून त्यांची घरं, वाहनं जाळण्याचा प्रयत्न झाला, ते अतिशय क्लेशदायक आणि वेदनादायक आहे. अतिक्रमण काढत असताना हिंसक असलेला मोर्चा विशाळगडाच्या पायथ्याशी गेला. तसेच तेथील लोकांची घरं आणि वाहनं जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली, असा दावा विजय वडेट्टीवार यांना केला. 

ते पुढे म्हणाले की, मला असं वाटतं की ही दंगल आणि त्यासोबतच्या घटना ह्या सरकारच्या पायाखालची वाळू घसरल्याने, आपली गेलेली पत सुधारण्यासाठी सरकार हिंदू-मुस्लिम वाद तयार करून आपली पोळी भाजण्याचं पाप करत आहे, हे आथा स्पष्ट झालं आहे. निवडणुकीच्या तोंडावर जाती आणि धर्मामध्ये दंगली घडवून आणून त्यातून लाभ मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न महायुती सरकारकडून केला जात आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारHindutvaहिंदुत्वMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार