शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"विशाळगडावरील दंगल हिंदुत्ववाद्यांनी कुणाच्या चिथावणीवरून केली? सरकारनं खुलासा करावा", काँग्रेसची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 16:00 IST

Vishalgad News : काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विशाळगड येथे झालेल्या तोडफोडीवरून राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. विशाळगडावरील दंगल हिंदुत्ववाद्यांनी कुणाच्या चिथावणीवरून केली, याच्यामागे कोण आहे, याचा खुलासा राज्य सरकारने करावा अशी मागणी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली. 

विशाळगडावरील अतिक्रमणांचा वाद मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात चिघळला आहे. तसेच यादरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमणांवर आक्रमण करत शिवभक्तांनी रविवारी मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली होती. त्यामुळे कोल्हापूरसह राज्यातील राजकारण सध्या तापलेलं आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विशाळगड येथे झालेल्या तोडफोडीवरून राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. विशाळगडावरील दंगल हिंदुत्ववाद्यांनी कुणाच्या चिथावणीवरून केली, याच्यामागे कोण आहे, याचा खुलासा राज्य सरकारने करावा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. 

विशाळगडावरील दंगलीबाबत प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ही दंगल मुळात हिंदुत्ववाद्यांनी कुणाच्या चिथावणीवरून केली. याच्यामागे कोण आहे? याच्यावर काय कारवाई होणार आहे, याचा खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये जे जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मागच्या काही दिवसांत महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे जे धिंडवडे निघाले आहेत, त्याला राज्य सकरार जबाबदार आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.  

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून, ज्या मशिदीच्या ठिकाणी हा वाद उदभवला आणि ज्या पद्धतीने याला हिंसक स्वरूप मिळालं, तसेच विशिष्ट्य समाजातील लोकांना लक्ष्य करून त्यांची घरं, वाहनं जाळण्याचा प्रयत्न झाला, ते अतिशय क्लेशदायक आणि वेदनादायक आहे. अतिक्रमण काढत असताना हिंसक असलेला मोर्चा विशाळगडाच्या पायथ्याशी गेला. तसेच तेथील लोकांची घरं आणि वाहनं जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली, असा दावा विजय वडेट्टीवार यांना केला. 

ते पुढे म्हणाले की, मला असं वाटतं की ही दंगल आणि त्यासोबतच्या घटना ह्या सरकारच्या पायाखालची वाळू घसरल्याने, आपली गेलेली पत सुधारण्यासाठी सरकार हिंदू-मुस्लिम वाद तयार करून आपली पोळी भाजण्याचं पाप करत आहे, हे आथा स्पष्ट झालं आहे. निवडणुकीच्या तोंडावर जाती आणि धर्मामध्ये दंगली घडवून आणून त्यातून लाभ मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न महायुती सरकारकडून केला जात आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारHindutvaहिंदुत्वMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार