शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
2
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
3
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
4
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
5
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपोर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!
6
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
7
Crime: मुलीला तरुणासोबत 'नको त्या अवस्थेत' पाहिलं; संतापलेल्या वडिलांनी जे केलं, त्याची गावभर चर्चा!
8
बॉस असावा तर असा! सलग तिसऱ्या वर्षी दिवाळीला कर्मचाऱ्यांना गिफ्ट केल्या ५१ आलिशान कार
9
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
10
‎‘भूपती-रुपेश गद्दार!', माओवाद्यांच्या‎ केंद्रीय समितीची आगपाखड; २७० नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर चळवळीत खदखद
11
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
12
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
13
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
14
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
15
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
16
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लक्झरी इलेक्ट्रिक कार देते ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
17
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
18
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
19
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
20
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  

"विशाळगडावरील दंगल हिंदुत्ववाद्यांनी कुणाच्या चिथावणीवरून केली? सरकारनं खुलासा करावा", काँग्रेसची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 16:00 IST

Vishalgad News : काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विशाळगड येथे झालेल्या तोडफोडीवरून राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. विशाळगडावरील दंगल हिंदुत्ववाद्यांनी कुणाच्या चिथावणीवरून केली, याच्यामागे कोण आहे, याचा खुलासा राज्य सरकारने करावा अशी मागणी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली. 

विशाळगडावरील अतिक्रमणांचा वाद मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात चिघळला आहे. तसेच यादरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमणांवर आक्रमण करत शिवभक्तांनी रविवारी मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली होती. त्यामुळे कोल्हापूरसह राज्यातील राजकारण सध्या तापलेलं आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विशाळगड येथे झालेल्या तोडफोडीवरून राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. विशाळगडावरील दंगल हिंदुत्ववाद्यांनी कुणाच्या चिथावणीवरून केली, याच्यामागे कोण आहे, याचा खुलासा राज्य सरकारने करावा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. 

विशाळगडावरील दंगलीबाबत प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ही दंगल मुळात हिंदुत्ववाद्यांनी कुणाच्या चिथावणीवरून केली. याच्यामागे कोण आहे? याच्यावर काय कारवाई होणार आहे, याचा खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये जे जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मागच्या काही दिवसांत महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे जे धिंडवडे निघाले आहेत, त्याला राज्य सकरार जबाबदार आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.  

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून, ज्या मशिदीच्या ठिकाणी हा वाद उदभवला आणि ज्या पद्धतीने याला हिंसक स्वरूप मिळालं, तसेच विशिष्ट्य समाजातील लोकांना लक्ष्य करून त्यांची घरं, वाहनं जाळण्याचा प्रयत्न झाला, ते अतिशय क्लेशदायक आणि वेदनादायक आहे. अतिक्रमण काढत असताना हिंसक असलेला मोर्चा विशाळगडाच्या पायथ्याशी गेला. तसेच तेथील लोकांची घरं आणि वाहनं जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली, असा दावा विजय वडेट्टीवार यांना केला. 

ते पुढे म्हणाले की, मला असं वाटतं की ही दंगल आणि त्यासोबतच्या घटना ह्या सरकारच्या पायाखालची वाळू घसरल्याने, आपली गेलेली पत सुधारण्यासाठी सरकार हिंदू-मुस्लिम वाद तयार करून आपली पोळी भाजण्याचं पाप करत आहे, हे आथा स्पष्ट झालं आहे. निवडणुकीच्या तोंडावर जाती आणि धर्मामध्ये दंगली घडवून आणून त्यातून लाभ मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न महायुती सरकारकडून केला जात आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारHindutvaहिंदुत्वMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार