शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

"संविधानामुळेच आपला देश संकटकाळातही एकसंध"; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:10 IST

शांतता आणि युद्ध दोन्ही काळात ठेवले मजबूत!

प्रयागराज: देशावर जेव्हा जेव्हा संकट आले, तेव्हा तेव्हा संविधानामुळे देश एकत्र आणि मजबूत राहिला आहे, असे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी सांगितले. येथे इलाहाबाद उच्च न्यायालयात अधिवक्ता चेंबर्स आणि मल्टी-लेव्हल पार्किंगच्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी गवई म्हणाले की, जेव्हा संविधान तयार केले जात होते, अंतिम मसुदा घटना समितीसमोर सादर केला गेला, तेव्हा काही लोक म्हणत होते की, हे संविधान खूप फेडरल आहे, तर काही म्हणत होते की, खूप एकात्मक आहे. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्तर दिले की, संविधान पूर्णपणे फेडरल नाही, पूर्णपणे एकात्मकही नाही. आम्ही असे संविधान दिले आहे जे भारताला शांती आणि युद्ध या दोन्ही काळात एकत्र आणि मजबूत ठेवेल.

गवई असेही म्हणाले की, मी नेहमी सांगतो की, बार आणि बेंच या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जोवर बार व बेंच एकत्र काम करीत नाहीत, तोपर्यंत न्यायाचा रथ पुढे जाऊ शकत नाही.

‘मूलभूत रचनेत बदलाचे अधिकार संसदेला नाहीत’

यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, १९७३ मध्ये १३ न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला की संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे आणि यासाठी ती मूलभूत अधिकारांमध्ये दुरुस्ती करू शकते; पण, संविधानाच्या मूलभूत रचनेत बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही. त्यावेळी या खंडपीठाने असेही सांगितले की, मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे दोन्ही संविधानाची आत्मा आहेत. ही दोन्ही तत्त्वे म्हणजे संविधानाच्या सुवर्ण रथाची दोन चाके आहेत. यातील एक चाक जरी थांबले तर संपूर्ण रथ थांबतो. 

त्यामुळेच विकासमार्गावर

स्वातंत्र्यानंतर भारत आता विकासाच्या मार्गावर आहे, हे संविधानामुळे शक्य झाले आहे. आज आपण आपल्या शेजारी देशांची स्थिती पाहतो. पण, भारत स्वतंत्र झाल्यानंतर विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. संविधान लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात विधीमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका यांनी सामाजिक, आर्थिक समानता निर्माण करण्यात मोठे योगदान दिले आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयConstitution Dayसंविधान दिन