शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

मनमोहनसिंग यांचा केंद्र सरकारने केला अपमान; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 07:02 IST

राहुल गांधी म्हणाले की, मनमोहनसिंग १० वर्षे पंतप्रधान होते. त्यांनी आखलेल्या धोरणांमुळे आजही गरीब व मागासवर्गीयांना मोठे बळ मिळते...

नवी दिल्ली : स्मारक बांधता येईल अशी जागा न निवडता निगमबोध घाटावर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय भाजपप्रणीत केंद्र सरकारने घेतला. या सरकारने देशाच्या थोर सुपुत्राचा व पहिल्या शीख पंतप्रधानांचा घोर अपमान केला आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला. त्यावर केंद्र सरकारने म्हटले आहे की, त्यांचे स्मारक उभारण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. स्मारकासाठी जागा निश्चित करून त्यासाठी ट्रस्ट स्थापन केला जाईल.

राहुल गांधी म्हणाले की, मनमोहनसिंग १० वर्षे पंतप्रधान होते. त्यांनी आखलेल्या धोरणांमुळे आजही गरीब व मागासवर्गीयांना मोठे बळ मिळते. आजवर सर्व माजी पंतप्रधानांचे अंतिम संस्कार विशिष्ट स्थळी करण्यात आले. मात्र मनमोहनसिंग यांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी भाजपप्रणीत सरकारने वेगळी भूमिका घेतली. काँग्रेसच्या सरचिटणीस व खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी भाजपप्रणीत केंद्र सरकारने योग्य जागा उपलब्ध करून दिली नाही. 

सरकारने म्हटले आहे की, मनमोहनसिंग यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय शुक्रवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कळविले होते. या स्मारकासाठी ट्रस्टची स्थापना व जागेची निवड करणे याला काही कालावधी लागू शकतो, असेही सरकारने म्हटले होते.

विनाकारण वाद वाढविला : गहलोतअंत्यसंस्कार आणि स्मारकावरून केंद्र सरकारने विनाकारण वाद वाढवल्याचा आरोप शनिवारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गहलोत यांनी केला. ते म्हणाले की, २०१२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाले तेव्हा तत्कालीन काँग्रेस सरकारने मुंबईच्या शिवाजी पार्कवर विशेष जागा निश्चित करून ठाकरेंचे अंत्यसंस्कार केले. काँग्रेसने सदैव सर्व पक्षांच्या नेत्यांना सन्मानजनक निरोप दिला. मात्र, भाजपने मनमोहन सिंग यांच्यासंदर्भात जे वर्तन केले ते अत्यंत दुर्दैवी आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीManmohan Singhडॉ. मनमोहन सिंगcongressकाँग्रेस