'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 21:19 IST2025-08-13T21:17:09+5:302025-08-13T21:19:04+5:30
Rahul Gandhi Statement on Savarkar: सावकरांवर विधाने केल्यामुळे माझ्या जीवाला धोका असल्याचे राहुल गांधींनी कोर्टात सांगितले. पण, कोर्टात दाखल करण्यात आलेल्या अर्जाच्या मजकूराबद्दल आता वकिलांनी यू-टर्न घेतला आहे.

'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
Rahul Gandhi Statement on Savarkar News: पुण्यातील एका न्यायालयातराहुल गांधींच्या वतीने एक निवदेन दाखल करण्यात आले. राहुल गांधींचे हे निवेदन वकिलांनी दाखल केले होते आणि त्यात असा उल्लेख होता की, सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जिवाला धोका आहे. सावरकर बदनामी प्रकरणातील खटल्यात राहुल गांधींच्या या विधानाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पण, दिवस मावळल्यावर या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं. कारण राहुल गांधींच्या वकिलांनी या विधानाबद्दल खुलासा केला आणि आपणच परस्पर त्या निवेदनातील मजकूर लिहिल्याचे आणि न्यायालयात सादर केल्याचे सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आज मी न्यायालयाला जे निवेदन सादर केले, ते माझ्या अशिलांची न बोलता तयार केले होते. त्या निवेदनातील मजकूर माझे अशिल राहुल गांधी यांच्याशी चर्चा न करताच लिहिला होता. त्यांनी याबद्दल तीव्र हरकत घेतली असून, असहमती व्यक्त केली आहे. त्यामुळे हे निवेदन परत घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करणार आहे, असे राहुल गांधी यांची पुणे कोर्टात बाजू मांडणारे वकील मिलिंद पवार यांनी सांगितले.
राहुल गांधी जी के वकील ने बिना उनसे बात किए या उनकी सहमति लिए अदालत में लिखित बयान दाखिल करके उनकी जान पर खतरे का हवाला दिया था.
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) August 13, 2025
इस बात से राहुल जी की घोर असहमति है.
इसलिए कल उनके वकील इस लिखित बयान को कोर्ट से वापस लेंगे.
यह रहा उनका वक्तव्य👇 pic.twitter.com/guKU97ldrL
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जिवाला धोका
सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधीविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या प्रकरणा मिलिंद पवार यांनी राहुल गांधींच्या नावे एक निवेदन न्यायालयात सादर केले. ज्यात असे म्हटलेले होते की, 'सावरकरांवरील माझ्या जिवाला धोका आहे. या प्रकरणातील तक्रारदार नथुराम गोडसेचे वंशज आहेत. तक्रारकर्त्याच्या कुटुंब हिंसक आणि घटनाबाह्य कृत्यांमध्ये होते, याचे पुरावे इतिहासात आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची परवानगी दिली जाऊ नये', असे या निवेदनात गांधीच्या संदर्भाने म्हटले गेले होते.