शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

तेलुगू देसम मोदी सरकारवर नाराज, दोन मंत्री राजीनामा देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2018 11:16 PM

आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे तेलगू देसमचे मंत्री गुरुवारी (8 मार्च) राजीनामा देणार आहेत.

अमरावती - आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे तेलगू देसमचे मंत्री गुरुवारी (8 मार्च) राजीनामा देणार आहेत. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी (7 मार्च)रात्री उशीरा ही घोषणा केलीय. तेलगू देसम पक्षाचे केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्री आहेत. नायडूंच्या या घोषणेनंतर हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी गुरुवारी राजीनामा देतील.

चंद्राबाबू यांनी असे ट्विट केले आहे की, केंद्र सरकार आमचे म्हणणे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. मला माहीत नाही आम्ही काय चूक केली, पण ते लोक निरर्थक बोलतायत. मी आमचा निर्णय मोदींना सांगण्यासाठी गेलो होते. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आम्ही गेली चार वर्षं संयम बाळगला. मी अनेकदा सर्व प्रकारे केंद्र सरकारला समजावण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प मांडल्यापासून आम्ही केंद्राकडे आंध्राला विशेष दर्जा देण्याची मागणी केली होती. पण केंद्रानं आमची दखल घेतली नाही. त्यामुळे एनडीए आणि केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत आणि तो आमचा अधिकार आहे. तेलुगू देसम पक्षाचे केंद्रातील मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी हे गुरुवारी राजीनामा देणार आहे, असेही चंद्राबाबूंनी स्पष्ट केलं आहे. 

शिवाय, आंध्र प्रदेश पुनर्रचनेच्या 2014 च्या कायद्यात तसंच संसदेत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न होणे हा राज्याच्या जनतेच्या भावनांचा अपमान असल्याची टीकादेखील नायडू यांनी केंद्र सरकारवर केली होती. 

केंद्र सरकारने आंध्र राज्याला विशेष दर्जा दिला नसल्यानंच तेलुगू देसम पक्ष रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बाहेर पडण्याची धमकी दिल्यानंतर सत्तारूढ भाजपाने आंध्रच्या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठवले होते. यापूर्वी रालोआची सत्ता असलेल्या राज्यांच्या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: जात होते. पण त्यावेळी ते अन्य कामात गुंतलेले असल्याने आंध्रच्या भावनांना आवर घालण्यासाठी स्वत: व्यंकय्या नायडू परिषदेत उपस्थित राहिले. यावेळी व्यंकय्या नायडूंनी चंद्राबाबूंशी चर्चा केली आणि चर्चेचा वृत्तांत पंतप्रधानांना कळवला. त्यानंतर चंद्राबाबू नायडूंची समजूत घालण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांना पाठवले होते.

राम माधवही आंध्रचेच आहेत पण नायडू यांनी त्यांना दाद दिली नाही. आपला संयम आता संपला आहे. आपण त्यासाठी चार वर्षे वाट बघितली पण केंद्राने आंध्रला आर्थिक मदत केली नाही. आता आपण लोकांना तोंड दाखवू शकत नाही. भाजपा आपल्याला बाजूला सारून आय.एस.आर. काँग्रेसशी हातमिळवणी करण्याची तयारी करीत असावी असा चंद्राबाबूंना संशय होताच. अखेर ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले आहेत. 

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडू