शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

पालघर झुंडहत्या प्रकरणाचे आरोपपत्र सुप्रीम कोर्टास हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 01:20 IST

चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०) व सुशीलगिरी महाराज कल्पवृक्षगिरी (३५), या दोन साधूंची या घटनेत, मुले पळविणारे असल्याच्या संशयावरून, झुंडशाहीने हत्या करण्यात आली होती.

नवी दिल्ली : मुंबईहून गुजरातकडे निघालेल्या दोन साधूंची मोटार रस्त्यात अडवून जमावाकडून त्यांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेशी संबंधित खटल्यात सादर करण्यात आलेले आरोपपत्र तपासणीसाठी सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्र सरकारला दिले.न्या. अशोक भूषण आणि न्या. आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठाने हे निर्देश देताना असेही सांगितले की, या घटनेला अनेक महिने उलटले असल्यामुळे, जमावापासून साधूंचे रक्षण करण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांविरुद्ध काय कारवाई केली याची माहिती, तसेच तपासाच्या प्रगतीचा अहवालही महाराष्ट्र सरकारने सादर करावा.

चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०) व सुशीलगिरी महाराज कल्पवृक्षगिरी (३५), या दोन साधूंची या घटनेत, मुले पळविणारे असल्याच्या संशयावरून, झुंडशाहीने हत्या करण्यात आली होती. हे दोन्ही साधू जुन्या आखाड्याचे होते. त्याच आखाड्याच्या काही अन्य साधूंनी व मृत साधूंच्या काही नातेवाईकांनी मिळून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांचे वकील अ‍ॅड. शशांक शेखर म्हणाले की, स्वत: पोलीसच या हत्येत सहभागी असल्याने निष्पक्ष तपास होईल, असा विश्वास वाटत नाही. त्यामुळे हा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्यात यावा.महाराष्ट्र सरकारचे वकील अ‍ॅड. राहुल चिटणीस यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली माहिती न्यायालयास दिली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुचविले की, संपूर्ण आरोपपत्रच मागवून घ्यावे म्हणजे काय लागू आहे व काय गैरलागू आहे, हे पाहता येईल. वरील निर्देश देऊन खंडपीठाने पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवली.याआधीही याच प्रकरणाशी संबंधित आणखी दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या गेल्या आहेत. त्यापैकी एका याचिकेत ‘सीबीआय’ तपासाची, तर दुसरीकडे ‘एनआयए’ तपासाची मागणी करण्यात आली आहे. यापैकी पहिल्या याचिकेवर न्यायालयाने ११ जूनमध्ये नोटीस काढली असून, महाराष्ट्र सरकारला उत्तराचे प्रतिज्ञापत्र करण्यास सांगितले आहे. त्या याचिकांमध्ये राज्य सरकारने तपास एकांगी किंवा सदोष पद्धतीने केला गेल्याचा इन्कार केला आहे.

टॅग्स :palgharपालघरCrime Newsगुन्हेगारीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय