शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

पद्मनाभ मंदिराचे सरकारी नियंत्रण सुप्रीम कोर्टाने फेटाळले, त्रावणकोर राजघराण्याचा व्यवस्थापन हक्क अबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 05:45 IST

स्वातंत्र्यानंतर त्रावणकोर संस्थान भारतीय संघराज्यात विलिन करताना तेथील संस्थानिक व भारत सरकार यांच्यात जो करार झाला होता त्यानुसार या पद्मनाभ मंदिराच्या व्यवस्थापनाचा हक्क ‘विश्वस्त’ या नात्याने संस्थानिकांकडेच कायम ठेवण्यात आला होता.

नवी दिल्ली : देशातील अत्यंत धनाढ्य हिंदू मंदिरांपैकी एक असलेल्या थिरुवनंतपुरममधील सुप्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिराचे व्यवस्थापन व नियंत्रण पूर्णपणे केरळ सरकारच्या हाती सोपविण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. ज्या त्रावणकोर संस्थानाने हे मंदिर बांधले त्या संस्थानाचे अखेरचे शासक आज हयात नसले तरी त्यांच्या निधनाने मंदिराचे व्यवस्थापन करण्याचा त्या राजघराण्याचा हक्क संपुष्टात येत नाही. त्यांचे वारसदार आजही त्या मंदिराचे विश्वस्तच आहेत, असे न्यायालयाने जाहीर केले.हे मंदिर पूर्वीच्या राजांनी सार्वजनिक मंदिर म्हणून बांधलेले आहे. त्यामुळे मंदिर व त्याची संपत्ती ही राजघराण्याची खासगी मालमत्ता नाही. परिणामी शेवटच्या महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांकडे मंदिराची मालकी नव्हे तर व्यवस्थापनाचा हक्क वारसाहक्काने येतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.स्वातंत्र्यानंतर त्रावणकोर संस्थान भारतीय संघराज्यात विलिन करताना तेथील संस्थानिक व भारत सरकार यांच्यात जो करार झाला होता त्यानुसार या पद्मनाभ मंदिराच्या व्यवस्थापनाचा हक्क ‘विश्वस्त’ या नात्याने संस्थानिकांकडेच कायम ठेवण्यात आला होता. ज्यांनी हा करार केला ते त्रावणकोरचे शेवटचे संस्थानिक चित्र तिरुनल बलराम वर्मा यांचे १९९१ मध्ये निधन झाल्यावर हा विश्वस्तपदाचा हक्क संपुष्टात येतो की वारसाहक्काने त्यांच्या वारसांकडे जातो, हा या प्रकरणात मुख्य मुद्दा होता.बलराम वर्मा यांच्या निधनानंतर त्यांचे धाकटे बंधू मार्तंड वर्मा यांनी विश्वस्त म्हणून मंदिराचे व्यवस्थापन पाहणे सुरु केले. नंतर मंदिराचे व्यवस्थापन केरळ सरकारने ताब्यात घ्यावे यासाठी तेथील उच्च न्यायालयात अपील केले गेले. न्यायालयाने ते मंजूर केले. मार्तंड वर्मा यांनी त्याविरुद्ध अपील केले. त्यावर हा निकाल झाला.कोषागारात अमाप संपत्तीगेल्या शेकडो वर्षांत राजघराण्याने व भाविकांनी दान दिलेली अपाम संपत्ती या मंदिराच्या कोषागारांमध्ये ठेवलेली आहे. मध्यंतरी न्यायालयाने ती कोषागारे उघडून त्यातील संपत्तीची खानेसुमारी करण्याचा आदेश दिला होता. त्यावेळी क्र. १५ चे कोषागार सोडून अन्य कोषागारे उघडली गेली. त्यातील संपत्ती ९० हजार कोटी रुपयांची असावी, असा अंदाज त्यावेळी व्यक्त केला गेला होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयKeralaकेरळ