शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

"मुलांवर प्रेम करणारी इतकी हिंसक कशी होईल"; मुलांची हत्या करणाऱ्या आईची कोर्टाने केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:20 IST

सुप्रीम कोर्टाने दोन मुलांच्या हत्या प्रकरणात छत्तीसगड येथील एका महिलेची सुटका केली आहे.

Supreme Court: छत्तीसगडमध्ये २०१५ मध्ये आपल्या दोन अल्पवयीन मुलींची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या महिलेची शिक्षा कमी करण्याचे आदेश मंगळवारी सुप्रीम कोर्टाने दिले. त्यानंतर, महिलेला हत्येऐवजी सदोष मनुष्यवधाची शिक्षा सुनावण्यात आली. छत्तीसगडमधील एका दुर्गम गावात राहणाऱ्या एका महिलेने तिच्या पाच आणि तीन वर्षांच्या दोन मुलींची लोखंडी रॉडने हत्या केली होती. हत्येनंतर ती सतत रडत राहिली. महिलेने न्यायालयाला सांगितले होते की गुन्हा करताना ती अदृश्य शक्तींच्या प्रभावाखाली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आरोपी महिलेची शिक्षा कमी केली. 

सुप्रीम कोर्टाने छत्तीसगडमधील या महिलेच्या शिक्षेत बदल करत तिची सुटका केली. मुलींच्या हत्येमागील हेतू सिद्ध होऊ शकला नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने भारतीय दंड संहितेचे कलम ३०२ (खून) रद्द करून त्याऐवजी कलम ३०४, भाग १  लावले. ही महिला नऊ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होती. आरोपी महिलेने ९ वर्षे १० महिने कोठडीत घालवले असल्याने सुप्रीम कोर्टाने तिला सोडण्याचा निर्देश दिले. कलम ३०४ च्या भाग २ मध्ये जास्तीत जास्त १० वर्षांची शिक्षा आहे.

"घटनेच्या १५ दिवस आधी ती महिला माता, बुद्धिदाई इत्यादी गोष्टींबद्दल बोलत होती. तिला मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी रुग्णालयातही नेण्यात आले. ग्रामीण भागात, जिथे अंधश्रद्धा खोलवर पसरलेली असते आणि मानसिक समस्यांना अदृश्य शक्तींच्या नियंत्रण म्हटलं जातं. तिथे तिला अचानक मानसिक विकाराचा झटका आला असावा ज्यामुळे ही हत्या झाली असावी," असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं.

"जर तिला इतका भयानक गुन्हा करण्यास प्रवृत्त करणारी कोणतीही कारणे नसतील, तर आपल्या मुलांवर प्रेम करणारी आणि पतीशी चांगले संबंध असलेली आई इतकी हिंसक कशी होऊ शकते हे समजण्या पलीकडचे आहे. तिच्या प्रिय मुलांचा तिनेच मृत्यू घडवून आणण्याचा कट रचल्याचा आरोप तिच्यावर कसा लावता येईल. ग्रामीण भागातील लोकांना स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजारांबद्दल माहिती असणे सामान्य नाही. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची मानसिक स्थिती तात्पुरती बिघडू शकते. बऱ्याचदा, लक्षणे ओळखणे कठीण असल्याने हे विकार ओळखता येत नाहीत आणि त्यांच्यावर उपचार केले जात नाहीत. लोक योग्य आणि वेळेवर वैद्यकीय मदत घेत नाहीत, ज्यामुळे वैद्यकीय परिस्थिती उद्भवू शकते," असेही सुप्रीम कोर्टाने म्हटलं.

"अपीलकर्त्याच्या गुन्हा करण्याच्या हेतूबद्दल शंका निर्माण करण्यासाठी परिस्थिती पुरेशी आहे. म्हणून, आम्हाला खात्री आहे की या प्रकरणात मृत्यू घडवून आणण्याचा हेतू सिद्ध झालेला नाही. त्यामुळे अपीलकर्त्याला आयपीसीच्या कलम ३०४-२ अंतर्गत कमी गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात येत आहे," असे न्यायमूर्तींनी म्हटलं. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयChhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारी