शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

मेघालयमधील खाणीत अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठीचे बचावकार्य अपुरे, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 2:11 PM

गेल्या 20 ते 22 दिवसांपासून मेघालयमधील खाणीत अडकून पडलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या बचावकार्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

नवी दिलेली -  गेल्या 20 ते 22 दिवसांपासून मेघालयमधील खाणीत अडकून पडलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या बचावकार्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. कोळशाच्या खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेले बचाव कार्यासाठी उचलण्यात आलेली पाऊले अपुरी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मेघालय सरकारला सांगितले आहे. मेघालयमधील कोळशाच्या खाणींमध्ये हे 15 मजूर गेल्या 13 डिसेंबरपासून अडकून पडले आहेत.  खाणीत अडकून पडलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात अद्याप यश का आलेले नाही, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.के. सिकरी आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीक यांच्या खंडपीठाने मेघालय सरकारकडे केली आहे. यादरम्यान, न्यायालयात हजर असलेल्या वकिलांनी खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले जात असून, केंद्र सरकारकडूनही मदत मिळत आहे, असे न्यायालयाला सांगितले. मात्र सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत आम्ही संतुष्ट नाही. इथे खाणीत अडकलेल्या 15 मजुरांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. असे न्यायमूर्तींनी राज्य सरकारच्या वकिलांना सुनावले. तसेच या प्रकरणी योग्य ते आदेश देता यावेत यासाठी केंद्राच्या अॅटर्नी जनरलनाही न्यायालयात बोलावण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले. 

मेघालयमधील खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी करणारी याचिका आदित्य एन. प्रसाद यांनी दाखल केली आहे. दरम्यान, या याचिकेवर न्यायालयात आजही सुनावणी सुरू राहणार आहे. मेघालयच्या पूर्वेला असलेल्या जैतीया पर्वतामध्ये असलेल्या एका खाणीत लितेन नदीचे पाणी भरल्याने खाणीत काम करणारे 15 मजूर आत अडकले होते.  

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत