शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
4
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
5
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
6
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
7
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
8
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
9
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
10
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
11
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
12
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
13
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
14
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
15
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
16
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
17
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
18
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
19
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
20
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया

...तरीही गुन्हेबाधितांना भरपाई द्या!

By admin | Updated: March 8, 2015 23:13 IST

एखाद्या फौजदारी खटल्यात पुरेशा पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटला तरी त्याच्या गुन्ह्यामुळे बाधित झालेल्या व्यक्तीला (व्हिक्टिम आॅफ क्राईम) भरपाई देण्याचा

अजित गोगटे, मुंबईएखाद्या फौजदारी खटल्यात पुरेशा पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटला तरी त्याच्या गुन्ह्यामुळे बाधित झालेल्या व्यक्तीला (व्हिक्टिम आॅफ क्राईम) भरपाई देण्याचा आदेश दिला जाऊ शकतो व न्यायदानात सामाजिक भान ठेवून प्रत्येक खटल्यात बाधित व्यक्तीस न्याय्य भरपाई देण्याचा विचार करणे हे न्यायालयांचे कर्तव्य आहे, असा निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने देशातील फौजदारी न्यायदानास नवी दिशा दिली आहे. न्या. टी. एस. ठाकूर आणि न्या. आदर्श कुमार गोयल यांनी गेल्या काही महिन्यांत परस्परपूरक असे अनेक निकाल देऊन गुन्हेबाधित व्यक्तीचा फौजदारी न्यायदानातील पोरकेपणा दूर करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले आहे. हे करताना न्यायालयाने दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ३५७ मधील, एरवी बव्हंशी दुर्लक्षित राहणाऱ्या, तरतुदींवरील जळमटे झटकून त्यांचा कल्याणकारी उद्देश अधोरेखित केला आहे.न्यायालय म्हणते की, व्यक्तिगत गुन्ह्यांसाठीही अभियोग चालविण्याचा सरकारने स्वत:कडे घेतलेला सर्वाधिकार आजही कायम असला तरी नव्या विचारानुसार केवळ गुन्हेगारास दंडित करणे हाच फौजदारी न्यायदानाचा उद्देश आता राहिलेला नाही. गुन्हेगार तुरुंगात गेला किंवा फासावर लटकला तरी त्याने बाधित व्यक्तीचे झालेले नुकसान भरून येत नाही. त्यामुळे दिली जाणारी शिक्षा केवळ गुन्हेगाराच्याच नव्हे, तर बाधित व्यक्ती आणि एकूणच समाजाच्या दृष्टीनेही न्याय्य कशी होईल याचा तौलनिक विचार करून न्यायालयांनी शिक्षा द्यायला हवी.या संदर्भातील पहिला निकाल या खंडपीठाने गेल्या वर्षी अंकुश शिवाजी गायकवाड वि. महाराष्ट्र सरकार या प्रकरणात दिला. त्यात खंडपीठाने म्हटले की, संबंधित गुन्ह्यासाठी कायद्यात दिलेली कारावासाची व दंडाची शिक्षा ठोठावण्याखेरीज न्यायालये दंडाच्या रकमेतून बाधित व्यक्तीला भरपाई देण्याचाही आदेश देऊ शकते किंबहुना असे करणे हे न्यायालयांचे कर्तव्य ठरते. त्यामुळे त्यांनी प्रत्येक खटल्यात भरपाई देण्याचा विषय तपासून पाहायला हवा.या निकालानंतरही फारसा फरक पडलेला नाही हे लक्षात आल्यावर खंडपीठाने आपल्यापुढे आलेल्या अपिलांमध्ये हा विषय स्वत: हाती घेतला आणि भरपाईचे स्वरूप व व्याप्ती अधिक विस्तारित केली. हे करताना न्यायालयाने म्हटले की, न्याय्य भरपाई ठरविताना न्यायालयांनी आरोपीची सांपत्तिक स्थिती व बाधित व्यक्तीची गरज यांचा तौलनिक विचार करावा. रास्त भरपाई आरोपीकडून दिली जाऊ शकत नसेल तर ती देणे सरकारची जबाबदारी ठरते.कलम ३५७ नुसार भरपाई देण्यासाठी प्रत्येक राज्य सरकारने ‘व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन फंड’ स्थापन करणे बंधनकारक आहे. कोणत्या गुन्ह्यासाठी किती व कशी भरपाई द्यायची याचे सविस्तर नियम प्रत्येक राज्याने करणे अपेक्षित आहे. न्यायालयाने केरळ सरकारने केलेले नियम आदर्श म्हणून मान्य केले असून त्यानुसार खून/मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना किमान पाच लाख रुपयांची भरपाई ठरविली आहे.कलम ३५७ नुसार न्यायालय आरोपीला केलेल्या दंडाची रक्कम बाधित व्यक्तीला भरपाई म्हणून देण्याचा आदेश देऊ शकते. आरोपीची सांपत्तिक स्थिती रास्त भरपाई देण्याएवढी नसेल तर सर्व किंवा पूरक भरपाई सरकारने देण्याचा आदेशही न्यायालय देऊ शकते.