शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

...तरीही गुन्हेबाधितांना भरपाई द्या!

By admin | Updated: March 8, 2015 23:13 IST

एखाद्या फौजदारी खटल्यात पुरेशा पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटला तरी त्याच्या गुन्ह्यामुळे बाधित झालेल्या व्यक्तीला (व्हिक्टिम आॅफ क्राईम) भरपाई देण्याचा

अजित गोगटे, मुंबईएखाद्या फौजदारी खटल्यात पुरेशा पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटला तरी त्याच्या गुन्ह्यामुळे बाधित झालेल्या व्यक्तीला (व्हिक्टिम आॅफ क्राईम) भरपाई देण्याचा आदेश दिला जाऊ शकतो व न्यायदानात सामाजिक भान ठेवून प्रत्येक खटल्यात बाधित व्यक्तीस न्याय्य भरपाई देण्याचा विचार करणे हे न्यायालयांचे कर्तव्य आहे, असा निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने देशातील फौजदारी न्यायदानास नवी दिशा दिली आहे. न्या. टी. एस. ठाकूर आणि न्या. आदर्श कुमार गोयल यांनी गेल्या काही महिन्यांत परस्परपूरक असे अनेक निकाल देऊन गुन्हेबाधित व्यक्तीचा फौजदारी न्यायदानातील पोरकेपणा दूर करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले आहे. हे करताना न्यायालयाने दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ३५७ मधील, एरवी बव्हंशी दुर्लक्षित राहणाऱ्या, तरतुदींवरील जळमटे झटकून त्यांचा कल्याणकारी उद्देश अधोरेखित केला आहे.न्यायालय म्हणते की, व्यक्तिगत गुन्ह्यांसाठीही अभियोग चालविण्याचा सरकारने स्वत:कडे घेतलेला सर्वाधिकार आजही कायम असला तरी नव्या विचारानुसार केवळ गुन्हेगारास दंडित करणे हाच फौजदारी न्यायदानाचा उद्देश आता राहिलेला नाही. गुन्हेगार तुरुंगात गेला किंवा फासावर लटकला तरी त्याने बाधित व्यक्तीचे झालेले नुकसान भरून येत नाही. त्यामुळे दिली जाणारी शिक्षा केवळ गुन्हेगाराच्याच नव्हे, तर बाधित व्यक्ती आणि एकूणच समाजाच्या दृष्टीनेही न्याय्य कशी होईल याचा तौलनिक विचार करून न्यायालयांनी शिक्षा द्यायला हवी.या संदर्भातील पहिला निकाल या खंडपीठाने गेल्या वर्षी अंकुश शिवाजी गायकवाड वि. महाराष्ट्र सरकार या प्रकरणात दिला. त्यात खंडपीठाने म्हटले की, संबंधित गुन्ह्यासाठी कायद्यात दिलेली कारावासाची व दंडाची शिक्षा ठोठावण्याखेरीज न्यायालये दंडाच्या रकमेतून बाधित व्यक्तीला भरपाई देण्याचाही आदेश देऊ शकते किंबहुना असे करणे हे न्यायालयांचे कर्तव्य ठरते. त्यामुळे त्यांनी प्रत्येक खटल्यात भरपाई देण्याचा विषय तपासून पाहायला हवा.या निकालानंतरही फारसा फरक पडलेला नाही हे लक्षात आल्यावर खंडपीठाने आपल्यापुढे आलेल्या अपिलांमध्ये हा विषय स्वत: हाती घेतला आणि भरपाईचे स्वरूप व व्याप्ती अधिक विस्तारित केली. हे करताना न्यायालयाने म्हटले की, न्याय्य भरपाई ठरविताना न्यायालयांनी आरोपीची सांपत्तिक स्थिती व बाधित व्यक्तीची गरज यांचा तौलनिक विचार करावा. रास्त भरपाई आरोपीकडून दिली जाऊ शकत नसेल तर ती देणे सरकारची जबाबदारी ठरते.कलम ३५७ नुसार भरपाई देण्यासाठी प्रत्येक राज्य सरकारने ‘व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन फंड’ स्थापन करणे बंधनकारक आहे. कोणत्या गुन्ह्यासाठी किती व कशी भरपाई द्यायची याचे सविस्तर नियम प्रत्येक राज्याने करणे अपेक्षित आहे. न्यायालयाने केरळ सरकारने केलेले नियम आदर्श म्हणून मान्य केले असून त्यानुसार खून/मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना किमान पाच लाख रुपयांची भरपाई ठरविली आहे.कलम ३५७ नुसार न्यायालय आरोपीला केलेल्या दंडाची रक्कम बाधित व्यक्तीला भरपाई म्हणून देण्याचा आदेश देऊ शकते. आरोपीची सांपत्तिक स्थिती रास्त भरपाई देण्याएवढी नसेल तर सर्व किंवा पूरक भरपाई सरकारने देण्याचा आदेशही न्यायालय देऊ शकते.