राजाचा आत्मा EVM मध्ये, EVMशिवाय मोदी निवडणुका जिंकू शकत नाहीत, राहुल गांधींचा सनसनाटी दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 11:04 PM2024-03-17T23:04:35+5:302024-03-17T23:05:26+5:30

Bharat Jodo Nyay Yatra: आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेमध्ये ईव्हीएमच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. राजा की आत्मा ईव्हीएममध्ये आहे हे खरे आहे. नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणुका जिंकू शकत नाहीत, असा सनसनाटी दावा राहुल गांधी यांनी केला.

Soul of Raja in EVMs, Without EVMs Narendra Modi Can't Win Elections, Rahul Gandhi's Sensational Claim | राजाचा आत्मा EVM मध्ये, EVMशिवाय मोदी निवडणुका जिंकू शकत नाहीत, राहुल गांधींचा सनसनाटी दावा 

राजाचा आत्मा EVM मध्ये, EVMशिवाय मोदी निवडणुका जिंकू शकत नाहीत, राहुल गांधींचा सनसनाटी दावा 

आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. यावेळी ईव्हीएमच्या मुद्द्यावरूनही राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. राजा की आत्मा ईव्हीएममध्ये आहे हे खरे आहे. नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणुका जिंकू शकत नाहीत, असा सनसनाटी दावा राहुल गांधी यांनी केला.

नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणुका जिंकू शकत नाहीत. विरोधीपक्षाला ईव्हीएम दाखवावे, ईव्हीएमबरोबर मतदान केल्यानंतर VVPAT स्लीप डब्ब्यात पडते त्याचीही मोजणी करा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली परंतु निवडणूक आयोग मोजणी करण्यास नकार देत आहे. मोदी फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत. मला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली, ईडी ऑफीसमध्ये अनेक तास बसवले पण घाबरलो नाही, मी कोणालाही घाबरत नाही. तसेच इंडिया आघाडीतील नेतेही घाबरत नाहीत. ही आघाडी हिंदुस्थानचे रक्षण करण्यास एकत्र आले आहेत. नरेंद्र मोदींकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी आहे. इलोक्टोरोल बाँडमधून खंडणी वसुली केली जाते. महान व्यक्तींनी एकच संदेश दिला आहे आणि तो म्हणजे नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान उघडा,असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. 

राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्व विरोधी पक्ष एका पक्षाविरोधात किंवा एका व्यक्तीच्या विरोधात लढत आहेत हे चुकीचे आहे. एका व्यक्तीला चेहरा बनवनू पुढे केले आहे. आम्ही या शक्तीच्या विरोधात लढत आहोत. नरेंद्र मोदी हा केवळ मुखवटा आहे. अभिनेत्याला जसे भूमिका दिल्या जातात तशाच भूमिका त्यांच्या कडून करून घेतल्या जातात, मोदींची ५६ इंचाची छाती नाही, मोदी एक पोकळ व्यक्ती आहे. राजा की आत्मा ईव्हीएममध्ये आहे हे खरे आहे. ईडी, सीबीआय सारख्या हिंदुस्थानच्या प्रत्येक संस्थेत राजाचा आत्मा आहे. भिती दाखवून पक्ष फोडले जात आहेत. पक्ष सोडणारे सर्वजण घाबरून भाजपात गेले आहेत. देशातील मीडिया व सोशल मीडियासुद्धा सामन्यांच्या हातात नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, महिलांचे प्रश्न आहेत पण ते दाखवले जात नाहीत.

यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संबोधित करत होते ते पुढे म्हणाले की. मुंबई हे सर्वात शक्तीशाली शहर आहे. सर्व देशाचे लक्ष मुंबईवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांची भूमी आहे, इथला विचार सर्व देशात पोहचतो. मोदींनी किती गॅरंटी दिल्या व त्या पूर्ण केल्या का? असा सवाल केला. आज लोकशाही व संविधान अबाधित ठेवणे आपली जबाबदारी आहे. संविधान बदलणे सोपे नाही पण तसा प्रयत्न केला तर देशात मोठी क्रांती होईल असा इशारा दिला.  

Web Title: Soul of Raja in EVMs, Without EVMs Narendra Modi Can't Win Elections, Rahul Gandhi's Sensational Claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.