शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
2
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
3
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
4
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
5
नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
6
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
7
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
8
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
9
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
10
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
11
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट
12
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
13
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
14
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
15
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
16
Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
17
भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'
18
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
19
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
20
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना आता हक्काचे घर; ‘मदत माश’ जमिनीवरील घरे नियमित होणार
Daily Top 2Weekly Top 5

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 21:38 IST

गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराच्या जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याच्या कथा आता समोर येऊ लागल्या आहेत.

ठळक मुद्देचिनी सैनिकांशी चर्चा करण्यासाठी गेलेले कर्नल बी. संतोष बाबू हे धारातीर्थी पडल्यानंतर बिहार रेजिमेंटचे जवान भडकलेअत्यंत रौद्र रूप धारण केलेले हे जवान चिन्यांवर तुटून पडलेया झटापटीत बिहार रेजिमेंटच्या जवानांनी  चीनच्या १८ सैनिकांच्या माना मुरगळल्या

नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीला काही दिवस उलटल्यानंतर आता या संघर्षात भारतीय लष्कराच्या जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याच्या कथा आता समोर येऊ लागल्या आहेत. गलवान खोऱ्यात सैन्य स्तरावर झालेल्या चर्चेदरम्यान चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर बेसावध क्षणी हल्ला केला. मात्र अचानक झालेल्या हल्ल्याक सुरुवातीला भारतीय जवानांचे मोठे नुकसान झाले. मात्र या हल्ल्यातून झटपट सावरत बिहार रेजिमेंटच्या जवानांनी मोर्चा सांभाळला आणि बघता बघता चिन्यांना पळता भुई थोडी केली.

 मिळालेल्या माहितीनुसार चिनी सैनिकांशी चर्चा करण्यासाठी गेलेले कर्नल बी. संतोष बाबू हे धारातीर्थी पडल्यानंतर बिहार रेजिमेंटचे जवान भडकले. अत्यंत रौद्र रूप धारण केलेले हे जवान चिन्यांवर तुटून पडले. भारतीय जवानांचा हा पलटवार पाहून चिन्यांनाही धक्का बसला. दरम्यान, या झटापटीत बिहार रेजिमेंटच्या जवानांनी  चीनच्या १८ सैनिकांच्या माना मुरगळल्या. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, १८ चिनी सैनिकांच्या माना मोडून लोंबकळत होत्या. तसेच अनेकांचे चेहरे ओळखण्या पलिकडे गेले होते.  

ही झटापट झाली तेव्हा बिहार रेजिमेंटच्या जवानांची संख्या चिनी सैनिकांपेक्षा खूप कमी होती. मात्र अशा विषम परिस्थितीतही समोर उभ्या ठाकलेल्या संकटाचा सामना करत बहागदूर जवानांनी चिन्यांना अद्दल घडवली. त्यामुळेच आता सीमाप्रश्नावर शांततेच्या मार्गाने चर्चा करण्याची भाषा चीन बोलत आहे.  

द एशियन एज या वृत्तपत्राने लष्करी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या झटापटीदरम्यान, जवानांनी अंतर्गत क्षमतेचा पुरेपूर वापर केला. गलवानमध्ये चिनी सैनिकांनी उभारलेले तंबू हटवण्याचे आदेश बिहार रेजिमेंटला मिळाले होते. त्यावर कारवाई करण्यासाठी बिहार रेजिमेंटचे जवान घटनास्थळावर पोहोचले होते. त्यांनी तंबू हटवण्याचा प्रयत्न केल्यावर चिनी सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर भारतीय जवानांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण....

भारत-चीनमधील तो करार, ज्यामुळे सीमेवर होत नाही गोळीबार....

त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर हा देश झाला सावध, लष्कराकडे सोपवली मोठी जबाबदारी

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन 

दरम्यान, कमांडिग ऑफिसर कर्नल बी. संतोष बाबू हे धारातीर्थी पडल्यावर बिहार रेजिमेंटच्या जवानांचा संयम सुटला. मात्र तिथे चिन्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे या झटापटीची माहिती जवळील तुकडीस देण्यात आली. बिहार रेजिमेंटचे घातक  पथक घटनास्थळवर पोहोचले तेव्हा त्यांची संख्या केवळ ६० होती. मात्र असे असतानाही भारतीय जवानांनी पराक्रमाची शर्थ केली. चार तास चाललेल्या झटापटीत चिन्यांनी तलवार आणि रॉडने हल्ला केला. मात्र भारतीय जवानांनी ही हत्यारे काढून घेत चिन्यांना त्यांच्याच हत्यारांनी झोडपले. भारतीय जवानांचा हा रुद्रावतार पाहून चिन्यांची एकच पळापळ उडाली. काही जण कडेकपारीत लपले. तेव्हा भारतीय जवानांनी त्यांना पकडून पकडून मारले. यादरम्यान, काही भारतीय जवान एलएसी पार करून चीनच्या हद्दीत पोहोचले होते. त्यांना नंतर चीनने परत पाठवले आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानladakhलडाखIndiaभारतchinaचीन