शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 21:38 IST

गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराच्या जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याच्या कथा आता समोर येऊ लागल्या आहेत.

ठळक मुद्देचिनी सैनिकांशी चर्चा करण्यासाठी गेलेले कर्नल बी. संतोष बाबू हे धारातीर्थी पडल्यानंतर बिहार रेजिमेंटचे जवान भडकलेअत्यंत रौद्र रूप धारण केलेले हे जवान चिन्यांवर तुटून पडलेया झटापटीत बिहार रेजिमेंटच्या जवानांनी  चीनच्या १८ सैनिकांच्या माना मुरगळल्या

नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीला काही दिवस उलटल्यानंतर आता या संघर्षात भारतीय लष्कराच्या जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याच्या कथा आता समोर येऊ लागल्या आहेत. गलवान खोऱ्यात सैन्य स्तरावर झालेल्या चर्चेदरम्यान चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर बेसावध क्षणी हल्ला केला. मात्र अचानक झालेल्या हल्ल्याक सुरुवातीला भारतीय जवानांचे मोठे नुकसान झाले. मात्र या हल्ल्यातून झटपट सावरत बिहार रेजिमेंटच्या जवानांनी मोर्चा सांभाळला आणि बघता बघता चिन्यांना पळता भुई थोडी केली.

 मिळालेल्या माहितीनुसार चिनी सैनिकांशी चर्चा करण्यासाठी गेलेले कर्नल बी. संतोष बाबू हे धारातीर्थी पडल्यानंतर बिहार रेजिमेंटचे जवान भडकले. अत्यंत रौद्र रूप धारण केलेले हे जवान चिन्यांवर तुटून पडले. भारतीय जवानांचा हा पलटवार पाहून चिन्यांनाही धक्का बसला. दरम्यान, या झटापटीत बिहार रेजिमेंटच्या जवानांनी  चीनच्या १८ सैनिकांच्या माना मुरगळल्या. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, १८ चिनी सैनिकांच्या माना मोडून लोंबकळत होत्या. तसेच अनेकांचे चेहरे ओळखण्या पलिकडे गेले होते.  

ही झटापट झाली तेव्हा बिहार रेजिमेंटच्या जवानांची संख्या चिनी सैनिकांपेक्षा खूप कमी होती. मात्र अशा विषम परिस्थितीतही समोर उभ्या ठाकलेल्या संकटाचा सामना करत बहागदूर जवानांनी चिन्यांना अद्दल घडवली. त्यामुळेच आता सीमाप्रश्नावर शांततेच्या मार्गाने चर्चा करण्याची भाषा चीन बोलत आहे.  

द एशियन एज या वृत्तपत्राने लष्करी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या झटापटीदरम्यान, जवानांनी अंतर्गत क्षमतेचा पुरेपूर वापर केला. गलवानमध्ये चिनी सैनिकांनी उभारलेले तंबू हटवण्याचे आदेश बिहार रेजिमेंटला मिळाले होते. त्यावर कारवाई करण्यासाठी बिहार रेजिमेंटचे जवान घटनास्थळावर पोहोचले होते. त्यांनी तंबू हटवण्याचा प्रयत्न केल्यावर चिनी सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर भारतीय जवानांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण....

भारत-चीनमधील तो करार, ज्यामुळे सीमेवर होत नाही गोळीबार....

त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर हा देश झाला सावध, लष्कराकडे सोपवली मोठी जबाबदारी

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन 

दरम्यान, कमांडिग ऑफिसर कर्नल बी. संतोष बाबू हे धारातीर्थी पडल्यावर बिहार रेजिमेंटच्या जवानांचा संयम सुटला. मात्र तिथे चिन्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे या झटापटीची माहिती जवळील तुकडीस देण्यात आली. बिहार रेजिमेंटचे घातक  पथक घटनास्थळवर पोहोचले तेव्हा त्यांची संख्या केवळ ६० होती. मात्र असे असतानाही भारतीय जवानांनी पराक्रमाची शर्थ केली. चार तास चाललेल्या झटापटीत चिन्यांनी तलवार आणि रॉडने हल्ला केला. मात्र भारतीय जवानांनी ही हत्यारे काढून घेत चिन्यांना त्यांच्याच हत्यारांनी झोडपले. भारतीय जवानांचा हा रुद्रावतार पाहून चिन्यांची एकच पळापळ उडाली. काही जण कडेकपारीत लपले. तेव्हा भारतीय जवानांनी त्यांना पकडून पकडून मारले. यादरम्यान, काही भारतीय जवान एलएसी पार करून चीनच्या हद्दीत पोहोचले होते. त्यांना नंतर चीनने परत पाठवले आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानladakhलडाखIndiaभारतchinaचीन