शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

एकता, समेटासाठी संयमाची आवश्यकता : श्रीलंका

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

कोलंबो : लोकांत सलोखा व एकतेची भावना निर्माण करण्यासाठी तमिळ समुदायाने आपणास पुरेसा वेळ द्यावा, असे श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी म्हटले आहे.

कोलंबो : लोकांत सलोखा व एकतेची भावना निर्माण करण्यासाठी तमिळ समुदायाने आपणास पुरेसा वेळ द्यावा, असे श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी म्हटले आहे.
लोकांत एकता, सलोख्याची भावना निर्माण होईल, अशा पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे आम्ही जाणतो; मात्र नवे सरकार नुकतेच सत्तेवर आले असल्याने सलोख्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुरेसा वेळ गरजेचा आहे, असे सिरीसेना म्हणाले. कोलंबो येथील विदेशी गुंतवणूकदारांशी संवाद साधताना ते येथे शुक्रवारी बोलत होते. सर्व समुदायांना बंधुभावाने राहता यावे यासाठी पार्श्वभूमी तयार करण्याची जबाबदारी आपल्या सरकारची आहे, असे सिरीसेना म्हणाले. सिरीसेना यांना त्यांचे पूर्वपदस्थ महिंदा राजपाक्षेंविरुद्धच्या निवडणुकीत मुस्लिम व तमिळ नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे आठ जानेवारीच्या निवडणुकीत ते विजयी झाले. निवडून आल्यानंतर तमिळ समुदायासोबतचा तणाव कमी करण्यासाठी उचललेल्या पावलांची गणतीही त्यांनी केली. लष्कराने अधिगृहित केलेली जमीन मुक्त केली. यासारखी अनेक पावले उचलल्याचे ते म्हणाले. समेट, सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठीच्या प्रक्रियेची गती संथ असल्याबद्दल तमिळ समुदायाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सिरीसेना यांनीही ही प्रतिक्रिया दिली. उत्तर प्रांत परिषद ताब्यात असलेल्या टीएनएने यादवीदरम्यानच्या कथित हिंसाचाराबद्दल आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी करणारा ठराव अलीकडेच मंजूर केला होता. टीएनए हा तमिळींचा मुख्य पक्ष आहे. दुसरीकडे सिरीसेना यांनी देशांतर्गत चौकशीला भर दिल्याने राष्ट्रवादी तमिळ गटही नाराज आहेत.