शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

एकता, समेटासाठी संयमाची आवश्यकता : श्रीलंका

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

कोलंबो : लोकांत सलोखा व एकतेची भावना निर्माण करण्यासाठी तमिळ समुदायाने आपणास पुरेसा वेळ द्यावा, असे श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी म्हटले आहे.

कोलंबो : लोकांत सलोखा व एकतेची भावना निर्माण करण्यासाठी तमिळ समुदायाने आपणास पुरेसा वेळ द्यावा, असे श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी म्हटले आहे.
लोकांत एकता, सलोख्याची भावना निर्माण होईल, अशा पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे आम्ही जाणतो; मात्र नवे सरकार नुकतेच सत्तेवर आले असल्याने सलोख्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुरेसा वेळ गरजेचा आहे, असे सिरीसेना म्हणाले. कोलंबो येथील विदेशी गुंतवणूकदारांशी संवाद साधताना ते येथे शुक्रवारी बोलत होते. सर्व समुदायांना बंधुभावाने राहता यावे यासाठी पार्श्वभूमी तयार करण्याची जबाबदारी आपल्या सरकारची आहे, असे सिरीसेना म्हणाले. सिरीसेना यांना त्यांचे पूर्वपदस्थ महिंदा राजपाक्षेंविरुद्धच्या निवडणुकीत मुस्लिम व तमिळ नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे आठ जानेवारीच्या निवडणुकीत ते विजयी झाले. निवडून आल्यानंतर तमिळ समुदायासोबतचा तणाव कमी करण्यासाठी उचललेल्या पावलांची गणतीही त्यांनी केली. लष्कराने अधिगृहित केलेली जमीन मुक्त केली. यासारखी अनेक पावले उचलल्याचे ते म्हणाले. समेट, सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठीच्या प्रक्रियेची गती संथ असल्याबद्दल तमिळ समुदायाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सिरीसेना यांनीही ही प्रतिक्रिया दिली. उत्तर प्रांत परिषद ताब्यात असलेल्या टीएनएने यादवीदरम्यानच्या कथित हिंसाचाराबद्दल आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी करणारा ठराव अलीकडेच मंजूर केला होता. टीएनए हा तमिळींचा मुख्य पक्ष आहे. दुसरीकडे सिरीसेना यांनी देशांतर्गत चौकशीला भर दिल्याने राष्ट्रवादी तमिळ गटही नाराज आहेत.