शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
3
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
4
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
5
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
6
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
7
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
8
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
9
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
10
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
11
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
12
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
13
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
14
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
15
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
16
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
17
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
18
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
19
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
20
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

1962मध्येही दिसले होते असेच सूर्य ग्रहण, ज्योतिष शास्त्रात युद्धाचे संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 15:38 IST

आपल्याला माहीतच असेल, की चीनने 1962मध्ये धोका देऊन भारतावर हल्ला केला होता आणि आताही लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात हिंसक झटापट झाली आहे. 

ठळक मुद्देचीनने 1962मध्ये धोका देऊन भारतावर हल्ला केला होता.1962मध्येदेखील ग्रह नक्षत्रांची अशीच स्थिती निर्माण झाली होती. सूर्यग्रहणावेळी नक्षत्रांचा ज्या प्रकारे संयोग झाला तसा गत 500 वर्षांतही झालेला नाही.

नवी दिल्ली : आज 2020मधील पहिले सूर्यग्रहण दिसले. या खगोलीय घटनेसंदर्भात ज्योतिष तज्ज्ञांचे आकलन फारसे चांगले संकेत देत नाही. ज्योतिषांचे म्हणणे आहे, की ग्रहांचा असा संयोग 1962मध्ये झाला होता. जेव्हा एका पाठोपाठ एक असे तीन ग्रहण लागले होते. काहीसे असेच यावेळीही होत आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार, या सूर्यग्रहणावेळी नक्षत्रांचा ज्या प्रकारे संयोग झाला तसा गत 500 वर्षांतही झालेला नाही. ज्योतिष तज्ज्ञांनी म्हटले आहे, की ग्रह-नक्षत्रांच्या अशा संयोगामुळे जगात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती यईल आणि ती संपूर्ण जगात थैमान घालू शकते.

PHOTO : 'या' महत्वाच्या भागावर चीनने केलाय कब्जा, आहे वादाचा सर्वात मोठा मुद्दा

सूर्यग्रहणादरम्यान ग्रहांचा संयोग विनाशकारी -ज्योतीष पंडित प्रतीक भट्ट यांच्या मते, ग्रह नक्षत्रांची एकूण स्थिती अत्यंत भयावह आहे. नैसर्गिक आपत्तीचा धोका कायम राहील. ज्योतिष शास्त्रानुसार, या काळात ग्रहांचा संयोग अत्यंत  विनाशकारी आहे. यांच्या प्रभावामुळे नैसर्गिक आपत्ती, भूकंप, सैन्यांतील झटापट अथवा युद्धही होऊ शकते.

गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

ज्योतिषशास्त्राचे म्हणणे आहे, की 1962मध्येदेखील ग्रह नक्षत्रांची अशीच स्थिती निर्माण झाली होती. अत्ताच 5 जूनला चंद्र ग्रहण झाले. दुसरे सूर्यग्रहण आज आहे. यानंतर आता जुलैमध्येही एक ग्रहण आहे. यापूर्व 1962मध्येदेखील असाच योग तयार झाला होता आणि सलग तीन ग्रहण झाले होते. 58 वर्षांपूर्वी 17 जुलै 1962 रोजी चंद्रग्रहण, 31 जुलैला सूर्य ग्रहण आणि 15 ऑगस्टला दुसऱ्यांदा चंद्रग्रहण लागले होते. 

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

आपल्याला माहीतच असेल, की चीनने 1962मध्ये धोका देऊन भारतावर हल्ला केला होता आणि आताही लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात हिंसक झटापट झाली आहे. 

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ज्योतिषाचार्य प्रतीक भट्ट यांनी दावा केला, की 7 जुलैपूर्वी भारत चीनविरोधात मोठे पाऊल उचलेल आणि इतर काही देशही भारताच्या बाजूने उभे राहतील. मोठे युद्ध होईल असे वाटत नाही. मात्र छोटे युद्ध अथवा हिंसक झटापट होण्याची पूर्ण शक्यता आहे.

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

टॅग्स :Astrologyफलज्योतिषIndiaभारतchinaचीनwarयुद्धSoldierसैनिक