शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

1962मध्येही दिसले होते असेच सूर्य ग्रहण, ज्योतिष शास्त्रात युद्धाचे संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 15:38 IST

आपल्याला माहीतच असेल, की चीनने 1962मध्ये धोका देऊन भारतावर हल्ला केला होता आणि आताही लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात हिंसक झटापट झाली आहे. 

ठळक मुद्देचीनने 1962मध्ये धोका देऊन भारतावर हल्ला केला होता.1962मध्येदेखील ग्रह नक्षत्रांची अशीच स्थिती निर्माण झाली होती. सूर्यग्रहणावेळी नक्षत्रांचा ज्या प्रकारे संयोग झाला तसा गत 500 वर्षांतही झालेला नाही.

नवी दिल्ली : आज 2020मधील पहिले सूर्यग्रहण दिसले. या खगोलीय घटनेसंदर्भात ज्योतिष तज्ज्ञांचे आकलन फारसे चांगले संकेत देत नाही. ज्योतिषांचे म्हणणे आहे, की ग्रहांचा असा संयोग 1962मध्ये झाला होता. जेव्हा एका पाठोपाठ एक असे तीन ग्रहण लागले होते. काहीसे असेच यावेळीही होत आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार, या सूर्यग्रहणावेळी नक्षत्रांचा ज्या प्रकारे संयोग झाला तसा गत 500 वर्षांतही झालेला नाही. ज्योतिष तज्ज्ञांनी म्हटले आहे, की ग्रह-नक्षत्रांच्या अशा संयोगामुळे जगात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती यईल आणि ती संपूर्ण जगात थैमान घालू शकते.

PHOTO : 'या' महत्वाच्या भागावर चीनने केलाय कब्जा, आहे वादाचा सर्वात मोठा मुद्दा

सूर्यग्रहणादरम्यान ग्रहांचा संयोग विनाशकारी -ज्योतीष पंडित प्रतीक भट्ट यांच्या मते, ग्रह नक्षत्रांची एकूण स्थिती अत्यंत भयावह आहे. नैसर्गिक आपत्तीचा धोका कायम राहील. ज्योतिष शास्त्रानुसार, या काळात ग्रहांचा संयोग अत्यंत  विनाशकारी आहे. यांच्या प्रभावामुळे नैसर्गिक आपत्ती, भूकंप, सैन्यांतील झटापट अथवा युद्धही होऊ शकते.

गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

ज्योतिषशास्त्राचे म्हणणे आहे, की 1962मध्येदेखील ग्रह नक्षत्रांची अशीच स्थिती निर्माण झाली होती. अत्ताच 5 जूनला चंद्र ग्रहण झाले. दुसरे सूर्यग्रहण आज आहे. यानंतर आता जुलैमध्येही एक ग्रहण आहे. यापूर्व 1962मध्येदेखील असाच योग तयार झाला होता आणि सलग तीन ग्रहण झाले होते. 58 वर्षांपूर्वी 17 जुलै 1962 रोजी चंद्रग्रहण, 31 जुलैला सूर्य ग्रहण आणि 15 ऑगस्टला दुसऱ्यांदा चंद्रग्रहण लागले होते. 

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

आपल्याला माहीतच असेल, की चीनने 1962मध्ये धोका देऊन भारतावर हल्ला केला होता आणि आताही लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात हिंसक झटापट झाली आहे. 

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ज्योतिषाचार्य प्रतीक भट्ट यांनी दावा केला, की 7 जुलैपूर्वी भारत चीनविरोधात मोठे पाऊल उचलेल आणि इतर काही देशही भारताच्या बाजूने उभे राहतील. मोठे युद्ध होईल असे वाटत नाही. मात्र छोटे युद्ध अथवा हिंसक झटापट होण्याची पूर्ण शक्यता आहे.

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

टॅग्स :Astrologyफलज्योतिषIndiaभारतchinaचीनwarयुद्धSoldierसैनिक