शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

UN मध्ये पाकिस्तानला आरसा; पाहा, भारताच्या महिला सचिव स्नेहा दुबे यांची दबंग कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 12:03 IST

पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावणाऱ्या भारताच्या प्रथम महिला सचिवांचे नाव आहे स्नेहा दुबे.

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा विषय उरकून काढला. यानंतर भारताने राइट टू रिप्लाय करत पाकिस्तानवर चांगलेच ताशेरे ओढत आरसा दाखवला. पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला सचिवांचे नाव आहे स्नेहा दुबे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणाऱ्या स्नेहा दुबे यांची कारकीर्द, प्रवास थक्क करणारा असल्याचे सांगितले जात आहे. (sneha dubey ifs profile first secretary unga reply kashmir and terrorist pakistan pm imran khan)

“ओसामाला शहीद म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की जम्मू काश्मीर, लडाख...”; भारताने पाकला सुनावले

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर जम्मू-काश्मीरचा मुद्दा उरकून काढण्याची ही पहिली वेळ नाही. पाकिस्तान मुद्दामहून भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन करण्यासाठी वारंवार काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असतो. वास्तविक पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे, हे उघड आहे. पाकिस्तानमध्ये दहशवादी उघडपणे फिरत असतात, याउलट तेथील अल्पसंख्यक समुदायावर अत्याचार होत आहे. पाकिस्तानातील परिस्थिती आणि फोलपणा जगासमोर येऊ नये, यासाठीच पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा सातत्याने मांडत असतो, या शब्दांत स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानला जागा दाखवून दिली आहे. 

TATA ग्रुपचा SuperApp साठी मेगा प्लान; रतन टाटांनी ७ लाख कर्मचारी कामाला लावले!

कोण आहेत स्नेहा दुबे?

स्नेहा दुबे या २०१२ बॅचच्या आयएफएस अधिकारी आहेत. सन २०१४ मध्ये त्यांना मॅड्रिड येथील भारतीय दूतावासात नियुक्ती करण्यात आली होती. आताच्या घडीला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या प्रथम सचिव आहेत. स्नेहा दुबे यांचे पदव्युत्तर शिक्षण जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून झाले आहे. तेथे त्यांनी एमए आणि एमफील पदवी संपादन केली. यापूर्वी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी संपादन केली होती. याआधीचे स्नेहा दुबे यांचे शिक्षण गोव्यात झाले. स्नेहा दुबे यांच्या कुटुंबीयात कुणीही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये नाहीत. 

Birla च्या ‘या’ कंपनीचा IPO जाहीर; २७०० कोटींचा निधी उभारणार, पाहा डिटेल्स

दरम्यान, भारताने पाकिस्तानवर टीका करताना दहशतवाद्यांना आश्रय देणे, मदत करणे आणि त्यांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानच्या इतिहासात आणि धोरणांमध्ये दिसून येत असल्याचे म्हटले आहे. यावरच न थांबता पाकिस्तानने अनधिकृतरित्या ताबा मिळवलेला भूभागही भारताचाच असल्याचा दावा भारताने केला आहे. आजही आपण पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या तोंडून दहशतवादाच्या घटना योग्य असल्याचा सांगण्याचे प्रयत्न झालेले पाहिले. जगामध्ये दहशतवादाला अशाप्रकारे पाठीशी घालणे स्वीकार करण्याची गोष्ट नाही, या शब्दांत भारताच्या पहिल्या महिला सचिव स्नेहा दुबे यांनी पाकवर हल्लाबोल केला.  

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान