श्री १००८ महावीर समवसरण पंचकल्याण महोत्सव कवठेसार पॅटर्न
By admin | Updated: May 12, 2014 20:56 IST
श्री १००८ महावीर समवसरण पंचकल्याण महोत्सव कवठेसार पॅटर्न
श्री १००८ महावीर समवसरण पंचकल्याण महोत्सव कवठेसार पॅटर्न
श्री १००८ महावीर समवसरण पंचकल्याण महोत्सव कवठेसार पॅटर्नसुगंधी फूल मातीत पडलं की, त्याच्या स्पर्शाने ती मातासुद्धा सुगंधित होते. सतारीच्या तारेला कलावान बोटांचा स्पर्श होताच ती मधुर स्वराने झंकारू लागते. वसंत ऋतूचे मोरपीस सृष्टीच्या अंगावर फिरू लागले की, ती बहरून येते. अशाच प्रकारे एखाद्या उदात्त विचारांनी प्रेरित झालेली माणसं कवठेसार या गावामध्ये राहतात.वास्तविक कवठेसार हे शिरोळ तालुक्यातील शहरांपासून दूर असलेले गाव, पण तरीही या गावामध्ये अगदी बहुजन समाजापासून ते सर्व समाजातील तरुण उच्चशिक्षित असून राज्याच्या मोठमोठ्या शहरांमध्ये विविध उच्च पदावर सेवेत आहेत. मराठा, लिंगायत, बहुजन समाज, जैन समाज आणि मुस्लिम समाजातील बांधव हे सर्वजण परस्परावलंबी असून गुण्यागोविंदाने राहतात. मुस्लिम बांधवांचा उरूस असो, विठ्ठल भक्तांचा हरिनाम पारायणाचा सोहळा असो किंवा जैन समाजाचा पंचकल्याणिक पूजा महोत्सव असो अथवा भगवान बुद्ध जयंती असो सर्वजण आनंदाने महोत्सवात सामील होतात हीच या गावची विशेषत: आहे.जैन धर्मातील तीर्थकरांच्या समवसरणांत गाय आणि वाघ, सिंह आणि हत्ती, साप आणि मंुगूस यासारखे प्राणीही आपलं जन्मवैर विसरून जिनेंद्र भगवतांच्या उपदेशाचं श्रवण करत असतात. भगवानांच्या भक्तीने भावविभोर होत असतात. त्याप्रमाणे सात सय्यद पीर महोत्सव असो, वारकर्यांची दिंडी असो किंवा महावीर जयंती असो. सर्व समाज अहिंसा, व्यसनमुक्ती, शाकाहार यांचे अनुकरण व पालन करतो.याच कवठेसारच्या मातीमध्ये दोन महापुरुष जन्मले. त्यांनी आपल्या कार्यकतृर्त्वाने व शुभकरांच्या विचारांच्या जोरावर आपले व्यक्तिमत्त्व उंचावून तेच साधुत्वाच्या दिव्य जीवनावर आरुढ झाले. या दोन महापुरुषांपैकी पहिले भाऊसो जिन्नाप्पा फरांडे यांचे पुत्र पवनकुमार भाऊसो फरांडे होत. तारुण्याच्या उंबरठ्यावर आलेल्या पूर्वाश्रमीच्या पवनकुमार यांनी आपल्या सर्व विकारवासना, मनाचा क्षुद्रकोलाहल यांना शांत करून मनाच्या विलासतेवर विजय मिळविला. संत शिरोमणी श्री आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांच्याकडून मुनिदीक्षा घेऊन ते सहजसागरजी मुनी महाराज बनले. सूर्याला जन्म देणारी पूर्व दिशा इतर दिशांमध्ये श्रेष्ठ ठरते. त्याप्रमाणे पूज्य सहज सागरजींना जन्म देणार्या माता-पिता धन्य आहेत.संसाराची नश्वरता व असहरता पूर्णपणे जाणून आपले जीवन संयम आणि चारित्र्य यावर आरुढ करणारे श्री जंबू दादा चंदोबा हे दुसरे नररत्न होत. आपले संसारी जीवन व्यापार, व्यवसाय यांनी व्यतीत करून त्यांनी धर्ममोक्ष, पुरुषार्थ साधन्याकरिता प. पू. १०८ श्री अर्हदबली महाराज यांच्याकडून दीक्षा घेऊन १०८ श्री धर्मभूषण महाराज बनले. त्याप्रकारे प. पू. १०८ सहजसागरजी महाराज, १०८ श्री धर्मभूषण महाराज कवठेसारमधून निर्माण झाले. ते कवठेसार या गावचे भूषण व गौरव आहेत. त्यांचा विचार व आचार यांचा वसा व वारसा प्रत्येक नागरिकांनी व तरुणांनी घ्यावा.- ब्र. राजकुमार चौगले सर........................................................भगवान महावीर समवसरण पंचकल्याण महामहोत्सव परमपूज्य १०८ श्री अर्हदबलीजी महाराज यांचा पावन चार्तुमास कवठेसार याठिकाणी सन २००४ साली संपन्न झाला. या चार्तुमासामध्ये पू. महाराजांनी अनेक शाश्वत व स्थायी स्वरुपाची कामे केली. त्याचेच प्रतीक म्हणजे कीर्तीस्तंभ व समवसरण मंदिराची निर्मिती होय. वास्तविक कवठेसारातील जैन समाज धनवान असून स्वकतृर्त्वाने स्वत:चा संसार सांभाळूनही तो दानधर्मबाबतही अग्रेसर आहे. त्यांनी भगवान महावीर समवसरण मंदिराची निर्मिती करून त्याची पंचकल्याण प्रतिष्ठापूजाही यथाविधी पूर्ण केली.दि. १२ ते १६ मे २०१४ या कालावधीमध्ये पंचकल्याण महोत्सव सानंद संपन्न होत आहे.दि. १२ मे २०१४ रोजी गर्भकल्याणिक संपन्न होत आहे. मातीच्या कुशीत दडलेल्या बिजाचे योग्य संरक्षण व संवर्धन करावे त्याप्रमाणे मातेच्या उदरामध्येे असलेल्या गर्भस्थ बालकाचे योग्य संगोपन करून त्याचेच जीवन संस्कारित होण्यासाठी महिलांनी या कालावधीमध्ये सत्वशील जीवन जगावे. धार्मिक क्रिया कराव्यात.दि. १३ मे २०१४ रोजी जन्मकल्याणिक संपन्न होत आहे. यादिवशी सौधर्म इंद्र आपल्या इंद्राणीसहित जिन बालकास पांडूकशिलेवर नेऊन त्याचे प्रक्षालन करतो.दि. १४ मे २०१४ रोजी राज्याभिषेक व दीक्षाकल्याणिक संपन्न होत आहे. महावीरांनी आपल्या वयाची तीस वर्षे सुखाने व्यतीत केली, पण अखेर त्यांच्या विलासतेवर वैराग्याने विजय मिळविला. क्रोध, मान, माया, लोभ हेच खरे मानवाच्या दु:खाला कारणीभूत असून यामुळे मानवाच्या सुखाचा नाश होतो. आपल्या तुच्छ विचार, वासनावर नियंत्रण ठेवून महावीरांनी आत्मसुखासाठी जीनदीक्षा घेतली.दि. १५ मे २०१४ रोजी केवलज्ञानकल्याणिक संपन्न होत असून यादिवशी मुनी महावीरांना केवलज्ञानाची प्राप्ती झाली. अंधाराचे वेष्ठण फाडून हसत येणार्या सूर्याप्रमाणे अनेक उपसर्गांच्या दिव्यातून महावीरांचे जीवन अधिकच तेजाळून निघाले.मानव आपल्या निंद्य आणि हीन कुकर्माने पापाच्या जाळ्यात गुरफुटून जातो आणि आपल्यावर येणार्या दु:खाचे खापर मात्र इतरांवर फोडतो. मनाचा उद्रेक शांत करून आपल्या आत्मिक अनंत वैभवाला तपश्चर्येच्या जोरावर मानव महामानव बनू शकतो.दि. १६ मे २०१४ रोजी निर्वाणकल्याणिक व १००८ कलशाभिषेक यांचा कार्यक्रम होणार आहे.जीवन जगत असताना मनुष्य जेव्हा सर्वांवर प्रेम करत व सर्वांना आनंद देत असतो तेव्हा त्याच्या जीवनाचा भावगंध त्याच्यानंतरही तो पुसला जात नाही. ज्यांच्या जगण्याला ताल आणि तोल आहे. माणुसकीचे व प्रेमाचे मोल आहे अशी माणसे मृत्यूनंतरही जगत असतात. भगवान महावीरही अशाच प्रकारे जगले आणि त्यांच्या निर्वाणानंतरही आजही चिरतरुण आहेत.आज मानव ईर्षा, क्रोध, अहंकार, मत्सर यासारख्या विकारांनी ग्रस्त आणि त्रस्त झाला आहे. एखाद्या जुनाट आणि पडक्या घरात उंदीर आणि घुशीने ठिकठिकाणी बिळे करावीत त्याप्रमाणे मानवी मन क्षुद्र विचार, वासना यांनी बरबटल्या आहेत. गरजत्या सागरांच्या लाटावरही मानवाला घर बांधणे शक्य आहे. रानटी हत्तीलाही जेरबंद करणे शक्य आहे. विषारी भुजंगाचे दात पाडणे शक्य आहे, पण आज मानवाला त्याच्या आयुष्यात आणि त्याच्याच मनात असलेल्या विकारवासनांच्या नागिणी त्याला ठेचता येत नाहीत. हे आजच्या बुद्धिमान समजल्या जाणार्या माणसांचा वेडेपणा नाही का?आपल्या उदात्त चारित्र्याने, शुभंकर विचाराने आपल्या सौंदर्यपूर्ण कृतीने आपले व्यक्तिमत्त्व उन्नत करावे. हाच बोध या पंचकल्याण पूजा महोत्सवातून प्रत्येक मानवाने घ्यावा.- ब्र. राजकुमार चौगुले सर.