शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून 10 रुपयांत जेवण, 'साहेब खाना' योजना सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 12:57 IST

गरिबांना पोटभर जेवण मिळावे यासाठी फक्त 10 रुपयांत थाळी देण्याचे वचन दिले आहे.

ठळक मुद्देजम्मू काश्मीरमध्ये गरजू लोकांसाठी 10 रुपयांत 'साहेब खाना' योजना सुरू करण्यात आली आहे. शिवसेना भवनात गरजू लोकांना 10 रुपयांत या सेवेचा लाभ घेता येणार आहे. 'साहेब खाना' मध्ये राजमा, भात, पुरी आणि चण्याची भाजी अशा पदार्थांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. युतीची सत्ता राज्यात आल्यानंतर 10 रुपयांत सामान्य माणसांना सकस जेवण दिले जाईल. एक रुपयात हृदयरोग आणि अन्य आरोग्य चाचण्या करण्यासाठी केंद्र उभे केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. गरिबांना पोटभर जेवण मिळावे यासाठी फक्त 10 रुपयांत थाळी देण्याचे वचन दिले आहे. याचाच आदर्श घेत जम्मू काश्मीरमध्ये गरजू लोकांसाठी 10 रुपयांत 'साहेब खाना' योजना सुरू करण्यात आली आहे. 

शिवसेनेचे जम्मू-कश्मीर प्रदेशाध्यक्ष मनीष सहानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमध्ये 'साहेब खाना' योजनेचे उद्घाटन करण्यात आले असून शिवसेना भवनात गरजू लोकांना 10 रुपयांत या सेवेचा लाभ घेता येणार आहे. दरदिवशी 500 लोकांसाठी दहा रुपयाप्रमाणे 'साहेब खाना' मध्ये राजमा, भात, पुरी आणि चण्याची भाजी अशा पदार्थांची व्यवस्था करण्यात येणार आहे. जम्मूचे राजकीय मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, श्री महाराजा गुलाब सिंह हॉस्पिटल व जम्मू तवी रेल्वे स्टेशनवर देखील या योजनेअंतर्गत 10 रुपयांत पोटभर जेवण सुरू करण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

शिवसेनेने वचननाम्यात दिलेल्या 10 रुपयांमध्ये जेवण या आश्वासनाची सर्वाधिक चर्चा होत आहे. शिववडा 12 रुपयाला मिळत असताना 10 रुपयांत जेवण कसे देणार अशी टीका विरोधकांकडून शिवसेनेवर होत आहे. यावर शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी काही दिवसांपूर्वी भाष्य केले होते. 

'वचननामा जाहीर करण्यापूर्वी तज्ज्ञांशी आणि अर्थतज्ज्ञांशी बोलून 10 रुपयांची भोजन थाळी देण्याचा निर्णय झाला आहे. मराठमोळ्या जेवणात 1-2 चपाती, 2-3 भाजी, वरण भात या एका थाळीचा खर्च 40 रुपये आहे. सरकारमध्ये आम्ही आल्यानंतर ही योजना लागू करू. यामध्ये 10 रुपये ग्राहक देईल तर 30 रुपये सरकार अनुदान देईल. वर्षाकाळी 1 हजार कोटी रुपये या योजनेला खर्च येईल. महाराष्ट्रात कोणीही उपाशी राहणार नाही अशी ही योजना आहे. वाढलेल्या उत्पन्नातून हा खर्च केला जाईल त्यासाठी वेगळा कर लादला जाणार नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा आहे. त्यामुळे अन्नावर सध्या आम्ही भर दिला आहे' असे सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाJammu Kashmirजम्मू-काश्मीरUddhav Thackerayउद्धव ठाकरे