शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 13:55 IST

पक्षाचे नेतृत्व गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीनेच करावे, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले होते. यानंतर या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना यूपीए-2च्या काळात पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती.तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वतःच त्यांना पंतप्रधान होण्याचा प्रस्तान दिला होता.काँग्रेस प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल यांचा दावा.

नवी दिल्ली -काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना यूपीए-2च्या काळात पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वतःच त्यांना पंतप्रधान होण्याचा प्रस्तान दिला होता, असा दावा काँग्रेस प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल यांनी केला आहे. ते ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलत होते.

गोहिल म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रकृतीच्या समस्येमुळे राहुल गांधी यांनी पंतप्रधान व्हावे, असा प्रस्तान ठेवला होता. मात्र, राहुल गांधी यांनी त्यांचा हा प्रस्ताव न स्वीकारता, आपण आपला कार्यकाळ पूर्ण करावा, अशी विनंती केली होती. 

गतकाळातील काही उदारहणे देत गोहिल म्हणाले, गांधी कुटुंबाने नेहमीच मोठेपणा दाखवला आहे. त्यांनी कधी सत्तेची महत्त्वाकांक्षा ठेवली नाही आणि कधीही सत्तेची लालसा धरली नाही. देशभरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि तरुणांची इच्छा आहे, की राहुल गांधी यांनी त्यांचे नेतृत्व करावे. मात्र, यासंदर्भात काँग्रेस कार्यसमिती आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच अंतिम निर्णय घेईल, असेही गोहिल म्हणाले.

तत्पूर्वी, पक्षाचे नेतृत्व गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीनेच करावे, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले होते. यानंतर या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. असे असतानाच गोहिल यांचे हे वक्तव्य आले आहे. ‘इंडिया टुमारो: कनव्हर्सेशन विथ द नेक्स्ट जनरेशन ऑफ पॉलिटिकल लीडर्स’ या पुस्तकात दावा करण्यात आला आहे, की प्रियंका यांनी राहुल गांधी यांच्या, गांधी कुटुंबा बाहेरील व्यक्तीनेच पक्षाचे नेतृत्व करावे, या भूमिकेचे समर्थन केले आहे. तसेच, फार कमी लोक आहे, जे पक्षाचे नेतृत्व करू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

हे पुसत्क ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटी प्रेसने नुकतेच प्रकाशित केले आहे. काँग्रेसने म्हटले आहे, की राहुल गांधींनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानतंर, प्रियंका गांधी यांची मुलाखत घेण्यात आली होती. या पुस्तकात भारतातील युवा नेत्यांच्याही मुलाखती आहेत. यात प्रियंका गांधी यांनी लेखक प्रदीप छिब्बर आणि हर्ष शाह यांना सांगितले, की 'त्यांनी (राहुल गांधी) आपल्यापैकी कुणीही पक्षाचे अध्यक्ष व्हायला नको, असे म्हटले आहे आणि मी त्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. मला असे वाटते, की पक्षाने त्याचा मार्ग स्वतःच निवडायला हवा.'

सध्या सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष आहेत. तसेच पक्षातील एक वर्ग सातत्याने राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची धुरा पुन्हा सांभाळावी यासाठी आग्रही आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसManmohan Singhमनमोहन सिंगSonia Gandhiसोनिया गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी