शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मिझोराममध्ये भूकंपांची मालिका; नागरिकांवर रात्री जागून काढण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 22:45 IST

नागरिकांनी उघड्यावर उभारले तात्पुरते तंबू; कारणे तपासण्याची मागणी

ऐजावल : मिझोराममध्ये मागील महिनाभरात भूकंपाची मालिकाच सुरू असल्यामुळे नागरिकांत प्रचंड दहशत पसरली आहे. भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेल्या म्यानमार सीमेजवळील चंफाई जिल्ह्यातील अनेक गावांतील नागरिक रात्री जागून काढीत आहेत. अनेकांनी झोपण्यासाठी घराबाहेर तंबू उभारले आहेत. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात भूकंप का होत आहेत, याची तपासणी सरकारने करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

१८ जूनपासून या भागात भूकंप सुरू आहेत. आतापर्यंत लहान-मोठे २२ धक्के बसले आहे. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ ते ५.५ इतकी मोजली गेली आहे. म्यानमार सीमेला लागून असलेल्या चंफाई जिल्ह्याला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला आहे. याशिवाय सैतुआल, सियाह आणि सेरचीप हे जिल्हेही हादरले आहेत, असेसूत्रांनी सांगितले.

चंफाई जिल्ह्याच्या उपायुक्त मारिया सीटी झुआली यांनी सांगितले की, भूकंपाच्या भीतीने कित्येक गावांत नागरिकांनी घराबाहेर तात्पुरते तंबू उभारले आहेत. जिल्हा प्रशासनाने त्यांना आच्छादन कापड, पाण्याचे बॅरल, सौर दिवे आणि प्रथमोपचाराची साधने पुरविली आहेत. बिस्किटे आणि इतर पुरवणी खाद्याचा पुरवठाही करण्यात आला आहे. प्रशासनपरिस्थितीवर पूर्ण लक्षठेवून आहे.

उपायुक्तांनी सांगितले की, या महिन्यात चंफाई जिल्ह्याला भूकंपाचे किमान २० धक्के बसले आहेत. जिल्ह्यातील १६ गावांत भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. १७० घरे क्षतिग्रस्तझाली आहेत. काही चर्च आणि कम्युनिटी हॉल्सचेही नुकसान झाले आहे.सूत्रांनी सांगितले की, चंफाई जिल्ह्यातील सर्वाधिक फटका बसलेल्या गावांत डंग्टलांगचा समावेश आहे. गावातील तरुण मदत कार्यात सहभागी आहे. डंग्टलांग यंग मिझो असोसिएशनचे (वायएमए) सहायक सचिव जॉन जोथान्मविआ फनाई यांनी सांगितले की, गावात पाच तात्पुरती शिबिरे उभारण्यात आली आहेत.

भूगर्भ तज्ज्ञांची पथके दाखल

च्अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात भूकंप का होत आहेत, याची तपासणी करण्याची अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. राज्य सरकारने तिची दखलही घेतली आहे. जून महिन्यात मुख्यमंत्री झोरामथंगा यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून भूकंपाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांचे पथक राज्यात पाठविण्याची विनंती केली आहे.

च्याशिवाय सततचे भूकंप कशामुळे होत आहेत, याचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने राज्याचे भूगर्भ व खनिज संपदा विभागाचे संयुक्त सचिव एच. लालबियाक्किमा यांना चंफाई जिल्ह्यात पाठविले आहे. लालबियाक्किमा हे भूगर्भ शास्त्रज्ञही आहेत.च् मिझोराम विद्यापीठाच्या भूगर्भ तज्ज्ञांनीही चंफाई जिल्ह्यातील काही गावांना भेटी दिल्या आहेत. तज्ञांचे हे पथक भूकंपग्रस्त भागातील विविध ठिकाणांना भेटी देऊन माहिती घेत आहे.

टॅग्स :Indiaभारत