शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

एसबीआयची स्वेच्छानिवृत्ती योजना; वयाची ५५ वर्षे अथवा सेवेची २५ वर्षे पूर्ण झालेले ठरणार पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 07:02 IST

मार्च २०२०च्या आकडेवारीनुसार एसबीआयमधील संख्या २.३९ लाख इतकी होती.

नवी दिल्ली : देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या अथवा २५ वर्षे सेवा झालेल्या ३०,१९० कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना तयार केली आहे. बँकेच्या व्यवस्थापनावरील खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सेकंड इनिंग्ज टॅप व्हीआरएस २०२० असे या स्वेच्छानिवृत्ती योजनेला नाव देण्यात आले असून, तिची अंमलबजावणी १ डिसेंबरपासून होणार असून, येत्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत लागू राहील. खूप कमी सेवाकाळ उरलेल्या, वैयक्तिक कारणांमुळे बँकेच्या सेवेतून मुक्त होऊन दुसºया क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी ही स्वेच्छानिवृत्ती योजना असल्याचे सांगण्यात आले.

मार्च २०२०च्या आकडेवारीनुसार एसबीआयमधील संख्या २.३९ लाख इतकी होती. ज्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज स्वीकारला जाईल, त्याला शिल्लक सेवाकाळातील (निवृत्तिवेतन देय ठरण्याच्या तारखेपर्यंत) एकूण वेतनाच्या ५० टक्के रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येईल. ही रक्कम मागील १८ महिन्यांच्या घेतलेल्या वेतनाच्या रकमेइतकी मर्यादित असेल. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाºयाला ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड, वैद्यकीय सुविधा, निवृत्तिवेतन आदी सर्व फायदे दिले जाणार आहेत. एसबीआयने सर्वप्रथम २००१ मध्ये स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली होती. आता एसबीआयने तयार केलेल्या योजनेला बँकेच्या संचालक मंडळाकडून मंजुरी मिळणे बाकी आहे.

२१७०.८५ कोटी रु पये वाचण्याची शक्यता

स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी एसबीआयमधील ११,५६५ अधिकारी व १८,६२५ कर्मचारी पात्र ठरू शकतात. त्यातील ३० टक्के कर्मचाºयांनी जरी स्वेच्छानिवृत्ती घेतली तर एसबीआय दरवर्षीच्या व्यवस्थापन खर्चातील २१७०.८५ कोटी रु पयांची रक्कम वाचवू शकते.

टॅग्स :SBIएसबीआयIndiaभारत