शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एसबीआयची स्वेच्छानिवृत्ती योजना; वयाची ५५ वर्षे अथवा सेवेची २५ वर्षे पूर्ण झालेले ठरणार पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 07:02 IST

मार्च २०२०च्या आकडेवारीनुसार एसबीआयमधील संख्या २.३९ लाख इतकी होती.

नवी दिल्ली : देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या अथवा २५ वर्षे सेवा झालेल्या ३०,१९० कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना तयार केली आहे. बँकेच्या व्यवस्थापनावरील खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सेकंड इनिंग्ज टॅप व्हीआरएस २०२० असे या स्वेच्छानिवृत्ती योजनेला नाव देण्यात आले असून, तिची अंमलबजावणी १ डिसेंबरपासून होणार असून, येत्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत लागू राहील. खूप कमी सेवाकाळ उरलेल्या, वैयक्तिक कारणांमुळे बँकेच्या सेवेतून मुक्त होऊन दुसºया क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी ही स्वेच्छानिवृत्ती योजना असल्याचे सांगण्यात आले.

मार्च २०२०च्या आकडेवारीनुसार एसबीआयमधील संख्या २.३९ लाख इतकी होती. ज्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज स्वीकारला जाईल, त्याला शिल्लक सेवाकाळातील (निवृत्तिवेतन देय ठरण्याच्या तारखेपर्यंत) एकूण वेतनाच्या ५० टक्के रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येईल. ही रक्कम मागील १८ महिन्यांच्या घेतलेल्या वेतनाच्या रकमेइतकी मर्यादित असेल. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाºयाला ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड, वैद्यकीय सुविधा, निवृत्तिवेतन आदी सर्व फायदे दिले जाणार आहेत. एसबीआयने सर्वप्रथम २००१ मध्ये स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली होती. आता एसबीआयने तयार केलेल्या योजनेला बँकेच्या संचालक मंडळाकडून मंजुरी मिळणे बाकी आहे.

२१७०.८५ कोटी रु पये वाचण्याची शक्यता

स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी एसबीआयमधील ११,५६५ अधिकारी व १८,६२५ कर्मचारी पात्र ठरू शकतात. त्यातील ३० टक्के कर्मचाºयांनी जरी स्वेच्छानिवृत्ती घेतली तर एसबीआय दरवर्षीच्या व्यवस्थापन खर्चातील २१७०.८५ कोटी रु पयांची रक्कम वाचवू शकते.

टॅग्स :SBIएसबीआयIndiaभारत