शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गंगा नदी स्वच्छतेसाठी देशात १०८ ठिकाणी सत्याग्रह; पुण्यातही सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 4:30 PM

एक दिवस गंगा नदी स्वच्छ होण्यासाठी सत्याग्रह अशी ही मोहिम असणार आहे.

ठळक मुद्दे स्वामी शिवानंद यांनी केला प्रारंभ जळतज्ञ डॉ. राजेंद्रसिंग यांनी मोहिम सर्वत्र नेण्यासाठी घेतला आहे पुढाकार

पुणे : गंगा नदी स्वच्छ होण्यासाठी पुण्यासह देशात १०८ ठिकाणी सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. त्याची सुरवात हरिद्वार येथील स्वामी शिवानंद सरस्वती यांच्यापासून झाली आहे. पुण्यात देखील अनेक कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला असून, सत्याग्रह साखळी सुरू करण्यात आली आहे. एक दिवस गंगा नदी स्वच्छ होण्यासाठी सत्याग्रह अशी ही मोहिम असणार आहे. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंग यांनी मोहिम सर्वत्र नेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गंगा स्वच्छ करण्यासाठी यापूर्वी पर्यावरणतज्ज्ञ जी. डी. अग्रवाल उर्फ स्वामी सानंद यांनी सत्याग्रह करून ११२ दिवस उपोषण केले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू फक्त गंगामाता स्वच्छ व्हावा, यासाठी होता. आता पुन्हा एकदा बलिदान देण्यासाठी स्वामी शिवानंद सरस्वती हरिद्वार येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांनी ३ आॅगस्टपासून हे उपोषण सुरू केले आहे. अभियानाविषयी पुण्यातून विनोद बोधनकर संयोजन करत असून, त्यांच्यासोबत जीवितनदी संस्था, सारंग यादवडकर, अनुपम सराफ, शैलजा देशपांडे व इतर संस्थाही सहभागी झाल्या आहेत. या विषयी धर्मराज पाटील म्हणाले,‘‘गेल्या अनेक वर्षांपासून देशातील नद्या अस्वच्छ आणि प्रदूषित झालेल्या आहेत. त्या स्वच्छ करण्यासाठी स्वामी सानंद यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून त्यांची ही मोहिम आता देशभर आणि जागतिक स्तरावर नेणे आवश्यक आहे. संयुक्त राष्टÑ संघात देखील या मोहिमेची माहिती दिली आहे. दररोज एक जण उपोषण करून या सत्याग्रहात सहभागी होत आहेत.’’ =====================स्वामी सानंद यांचे बलिदान विसरू शकत नाही. त्यांची स्वच्छ गंगेची मोहिम आपण पुढे नेणे आवश्यक आहे. सरकार यावर काहीच करताना दिसत नाही. स्थानिक, राज्य, देश आणि जागतिक पातळीवर याबाबत जनजागृती झाली तर गंगा स्वच्छतेसाठी प्रयत्न होतील.   - डॉ. राजेंद्रसिंग, जलतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेriverनदीWaterपाणीCentral Governmentकेंद्र सरकार