शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

'राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडणं हीच काँग्रेसची समस्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 12:31 PM

राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

ठळक मुद्देकाँग्रेसचे जेष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी काँग्रेस पक्षाच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी पद सोडणं हीच काँग्रेससाठी समस्या असल्याचं सलमान खुर्शीद यांनी म्हटलं आहे.राहुल गांधींच्या या निर्णयामुळे लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतरही पक्षाला आत्मपरीक्षण करता आलेले नाही.

नवी दिल्ली - काँग्रेसचे जेष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी काँग्रेस पक्षाच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावर पहिल्यांदा खुर्शीद यांनी वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांनी पद सोडणं हीच काँग्रेससाठी समस्या असल्याचं सलमान खुर्शीद यांनी म्हटलं आहे. 'आमचे नेते सोडून गेले हीच आमची मोठी समस्या आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षावरील संकट आणखी वाढलं आहे' असं खुर्शीद यांनी म्हटलं आहे. 

राहुल गांधींच्या या निर्णयामुळे लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतरही पक्षाला आत्मपरीक्षण करता आलेले नाही. लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला याचं विश्लेषण करण्यासाठी आम्हाला अजूनही एकत्र येता आलेलं नाही अशी खंत खुर्शीद यांनी व्यक्त केली आहे. राहुल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर उणीव जाणवू लागली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षासमोरील संकट आणखी वाढलेलं दिसत आहे. हे पद सध्या सोनिया गांधी यांनी सांभाळलं आहे अशी माहिती सलमान खुर्शीद यांनी दिली आहे. 

सलमान खुर्शीद यांनी 'राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा द्यायला नको होता. त्यांनी अजूनही या पदावर राहायला हवं होतं, असं मला वाटतं. राहुल गांधी या पदावर कायम राहावेत आणि नेतृत्व त्यांच्याकडे असावे असे फक्त मलाच नाही तर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनाही वाटत आहे. सोनिया गांधी यांनी हे पद सांभाळलं असलं तरी ती एक तात्पुरती व्यवस्था आहे' असं म्हटलं आहे. 

पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस रणनीती बनवणार

हिंदी भाषिक राज्यांत पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस रणनीती बनवत आहे. उच्च पदस्थ सूत्रांनुसार उत्तर प्रदेशची प्रभारी असतानाही काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या रणनीतीच्या केंद्रस्थानी आहेत. प्रियंका गांधी आधी उत्तर प्रदेशमध्ये पक्ष तळागाळात उभा करण्याचा प्रयत्न करतील व त्यानंतर बिहार, छत्तीसगड, राजस्थान, पंजाबसारख्या उत्तर भारतातील राज्यांत काँग्रेसला बळकट केले जाईल. उत्तर प्रदेशमध्ये दशकांपासून सत्तेपासून वंचित राहिलेला काँग्रेस पक्ष आता सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नांत आहे. त्यासाठी प्रियंका गांधी यांनी राज्याच्या जुन्या काँग्रेस नेत्यांना मार्गदर्शन मंडळात सामावून घेऊन राज्याची सूत्रे तरूण नेत्यांच्या हाती सोपवली आहे. दोन वेळा आमदार असलेले अजय कुमार लल्लू यांना गांधी यांनी राज बब्बर यांच्या जागी अध्यक्ष नियुक्त केले तर 12 सरचिटणीस, 4 उपाध्यक्ष, 18 सल्लागार समिती सदस्य आणि 8 कार्यकारी दल स्थापन केले आहेत.

 

टॅग्स :salman khurshidसलमान खुर्शिदRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस