रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण, क्वाड अन् ब्रिक्स; भारताचे सर्वांशी सलोख्याचे संबंध- एस जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 21:41 IST2025-03-22T21:41:10+5:302025-03-22T21:41:29+5:30

भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांनी महत्वाची माहिती दिली.

'Russia-Ukraine, Israel-Iran...India has friendly relations with all'- S Jaishankar | रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण, क्वाड अन् ब्रिक्स; भारताचे सर्वांशी सलोख्याचे संबंध- एस जयशंकर

रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण, क्वाड अन् ब्रिक्स; भारताचे सर्वांशी सलोख्याचे संबंध- एस जयशंकर

S. Jainshankar : सध्या जगभरात अस्थिरतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. काही देशांमद्ये थेट युद्ध सुरू आहे, तर काही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण काळात भारताने सर्व देशांशी चांगले संबंध ठेवून, स्वतःला मजबूत स्थितीत ठेवले आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताची डिप्लोमसी आणि इतर देशांशी असलेल्या संबंधांवर महत्वाची प्रतिक्रिया दिली.

बिझनेस टुडेचा एका कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांनी भारताची आर्थिक धोरणे आणि जगाचा बदलता मूड, व्यवसाय, राजकीय परिस्थिती आणि आव्हानांवर स्पष्टपणे भाष्य केले. ते म्हणाले की, सध्याच्या भू-राजकीय गोंधळाच्या काळात भारत अशा काही देशांपैकी एक आहे, जो युक्रेन आणि रशिया, तसेच इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी संवाद साधू शकतो. 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र परराष्ट्र धोरणालाही लागू होतो. आजच्या ध्रुवीकरणाच्या युगात रशिया आणि युक्रेन, इस्रायल आणि इराण, क्वाड आणि ब्रिक्स या देशांशी जोडले जाऊ शकणाऱ्या काही देशांपैकी भारत आहे.

सबका साथ, सबका विकास...
जयशंकर पुढे म्हणतात, 'सबका साथ, सबका विकास' ही घोषणा परराष्ट्र धोरणातही लागू होते. पाश्चात्य आणि युरोपीय देशांप्रमाणे भारताने युक्रेन-रशिया युद्धात कोणत्याही बाजूचे समर्थन केले नाही आणि नेहमीच शांततेचा पुरस्कार केला आहे. भारताची भूमिका नेहमीच शांततेसाठी आहे. 2023 मध्ये इस्रायलवर हमासच्या अचानक हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या मध्यपूर्वेतील संघर्षांदरम्यान भारताने इराण आणि इस्रायलशी आपल्या धोरणात्मक संबंधांमध्ये संतुलन राखले. इस्त्राईल भारताला एक प्रमुख संरक्षण पुरवठादार म्हणून उदयास आला आहे, तर इराणकडून कच्चे तेल भारताच्या गरजा पूर्ण करते.

जगाची राजकीय परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे 
आपले म्हणणे पुढे नेत जयशंकर म्हणतात, आजच्या काळात जगातील राजकीय परिस्थिती समजून घेणे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. यामुळे संधी आणि आव्हाने, दोन्ही येतात. आपण इथे व्यवसायाबद्दल बोलत असू, पण प्रत्यक्षात ही गोष्ट रोजगार निर्माण करण्याची आणि देशाला पुढे नेण्याची आहे. जेव्हा व्यवसाय यशस्वी होतात, मग ते देशात असो किंवा परदेशात, आपल्याकडे 'विकसित भारत'चे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक असलेली ताकद, तंत्रज्ञान आणि संधी उपलब्ध होते.

गेल्या काही वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेने अनेक वादळे पाहिली आहेत. कोविडने पुरवठा साखळीवर परिणाम पाडला, युक्रेनच्या संकटामुळे अन्नपदार्थ, इंधन आणि खतांबद्दल चिंता वाढली. ऑक्टोबर 2023 पासून पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे सागरी व्यापार ठप्प झाला असून, आशिया-युरोप व्यापारावर परिणाम झाला आहे. हवामान आणि राजकीय तणावाने डिजिटल आणि तंत्रज्ञान जगालाही हादरवून सोडले.

'हील इन इंडिया'ची वेळ 
टेक आणि सेवांनी परिपूर्ण भविष्यासाठी आपल्याला आपल्या तरुणांना जगासाठी योग्य बनवायचे आहे. अनेक देशांमध्ये कामाची गरज आणि लोकसंख्या यांच्यातील समन्वय बिघडला आहे. भारताने याला संधीत रूपांतरित केले आणि मोबिलिटी भागीदारीद्वारे आपली प्रतिभा जगासमोर नेली. आपल्या लोकांच्या सुरक्षित प्रवासासाठी सर्व मदतीची व्यवस्था करण्यात आली. आता पर्यटन हा केवळ प्रवासाचा विषय राहिला नसून ते अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे साधन बनले आहे. 'हील इन इंडिया'ची वेळ आली आहे आणि ही आपच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Web Title: 'Russia-Ukraine, Israel-Iran...India has friendly relations with all'- S Jaishankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.