शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

रशिया, चीन आणि पाकिस्तानची हातमिळवणी, भारताकडे दुर्लक्ष

By admin | Published: December 29, 2016 2:56 PM

रशिया, चीन आणि पाकिस्तान इसिसच्या विरोधात अफगाणिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या तालिबान्यांचा वापर करून घेण्यासाठी एकत्र आले आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 29 - रशिया, चीन आणि पाकिस्तान इसिसच्या विरोधात अफगाणिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या तालिबान्यांचा वापर करून घेण्यासाठी एकत्र आले आहेत. मात्र त्यामुळे भारतासोबत रशियाचे असणा-या मैत्री संबंधांवर विपरीत परिणाम होणार आहेत. चीन, रशिया आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींची यासंदर्भात मॉस्कोमध्ये नुकतीच एक भेट झाली. यावेळी अफगाणिस्तानमध्ये बिघडत असलेल्या परिस्थितीसंदर्भात त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. मात्र या तीन देशांच्या भेटीवर अफगाणिस्तान सरकारनं निषेध व्यक्त केला आहे. यावेळी या तिन्ही देशांनी ही चर्चा थांबवून पुढच्या वेळी अफगाणिस्तानलाही सामील करून घेण्याचा विचार व्यक्त केला. इराणलाही या गटात येण्यासाठी या तिन्ही देशांचे आधीपासूनच प्रयत्न सुरू आहेत. रशियन विश्लेषक आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या नंदन उन्नीकृष्णन यांच्यामते, भारत आणि रशियादरम्यान संवाद मर्यादित स्वरूपात आहे. मात्र रशियाच्या या कारवाईमुळे भारतासोबत रशियाचे संबंध बिघडू शकतात. गेल्या काही दिवसांपूर्वीच भारतानं रशियाकडून जवळपास 10 मिलियन डॉलरची युद्धसामग्री खरेदी केली आहे. तसेच रशिया आणि चीनलाही काबूल आणि तालिबान्यांमध्ये शांती चर्चा हवी आहे, असंही बैठकीनंतर निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या चर्चेत भारताची अनुपस्थिती लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. भारत नेहमीच तालिबान्यांच्या विरोधात अफगाणिस्तानसोबत आहे. भारत, अफगाण सरकार आणि अमेरिकेचंही तालिबान्यांविरोधात एकमत झालं आहे.