शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

मोदी-शाह प्रत्येकवेळी विजय मिळवून देऊ शकत नाही; आरएसएसचा भाजपला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 8:29 AM

अरविंद केजरीवाल यांच्या भगव्याविषयीच्या भूमिकेवर भाजपने लक्ष ठेवण्याची आवश्यकता 'ऑर्गनायझर'चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर सुरू  भारतीय जनता पक्षात सुरू असलेली समीक्षा अद्याप सुरूच आहे. आता दिल्लीतील पराभवावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला इशारा दिला आहे. प्रत्येकवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हेच विजय मिळवून देऊ शकत नसल्याचे आरएसएसने म्हटले आहे. 

आरएसएसचे इंग्रजी मुखपत्र 'ऑर्गनायझर' मध्ये दीनदयाल उपाध्याय यांना कोट करताना दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची समीक्षा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपचे संघटन आणि उमेदवारांविषयी विस्तारीत अवलोकन करण्यात आले आहे.

प्रत्येकवेळी मोदी-शाह भाजपला विजय मिळवून देऊ शकत नाहीत. त्यासाठी संघटनेची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. संघटनेच्या स्थरावर भाजपने हे समजून घ्यायला हवं की, मोदी आणि शाह विधानसभा स्तरावरील निवडणुकीत नेहमीच मदत करू शकत नाही. स्थानिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिल्लीत संघटनेचे पुनर्गठन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे आरएसएसने म्हटले आहे. 

दरम्यान 2015 नंतर भाजपची स्थानिक पातळीवर असलेली यंत्रणा उर्जित अवस्थेत आणण्यात आणि निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रचार आणि प्रसाराला जोर आणण्यात सातत्याने अपयश येत आहे. त्यामुळे पराभवाला समोरे जावे लागत असल्याचे दिल्ली डायवर्जेंट मेंजेट या लेखात म्हटले आहे.  यामध्ये पुढे लिहिले की, शाहीन बागविषयीचा भाजपचा नेरटीव्ह यशस्वी झाला नाही. तर अरविंद केजरीवाल यावर स्पष्ट होते. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या भगव्याविषयीच्या भूमिकेवर भाजपने लक्ष ठेवण्याची आवश्यकता 'ऑर्गनायझर'चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी व्यक्त केली आहे.