शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

“फाळणीवेळी भारतानं जे भोगलंय, ते कधी विसरता येणार नाही”: मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 11:02 AM

हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगली कामे करण्यासाठी सक्षम व्हायला हवे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) गेल्या काही दिवसांपासून अनेक विषयांसंदर्भात आपल्या भूमिका स्पष्ट करताना पाहायला मिळत आहे. यानंतर त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही होताना दिसत आहेत. यातच आता मोहन भागवत यांनी देशाच्या फाळणीवरून पुन्हा एकदा एक वक्तव्य केले आहे. फाळणीवेळी भारताला जे भोगावे लागले आहे, भारताने जे सोसले आहे, ते कधी विसरता येणार नाही, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

नोएडा येथे कृष्णानंद सागर लिखित ‘विभाजनकालीन भारत के साक्षी’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमावेळी मोहन भागवत यांनी फाळणीवेळच्या कटू स्मृतींना उजाळा दिला. आपण आपला इतिहास वाचायला हवा आणि सत्य स्वीकारायला हवे. हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी सक्षम व्हायला हवे, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. 

काहीतरी चांगली कामे करण्यासाठी सक्षम व्हायला हवे

हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगली कामे करण्यासाठी सक्षम व्हायला हवे. भारताने फाळणीच्या काळात जे सोसले आहे, ते विसरता येणार नाही. ते केवळ तेव्हाच विसरता येईल जेव्हा पुन्हा सगळे पूर्वीसारखे होऊन फाळणी रद्द होईल. सर्वांना सोबत घेऊन चालणारी भारताची विचारधारा आहे. स्वतः बरोबर आणि बाकीचे सगळे चूक असे मानणारी ही विचारधारा नाही. मात्र, इस्लामिक आक्रमकांची मात्र विचारसरणी अशीच होती की, फक्त आपणच बरोबर बाकी सगळे चूक. ब्रिटीशांची विचारसरणीही तशीच होती. इतिहासात घडलेल्या वादाचे, लढाईचं मूळ हेच होते, असेही मोहन भागवत यांनी सांगितले. 

एकदा फाळणी झाली, पण आता ती पुन्हा होणार नाही

या आक्रमकांनीच १८५७ च्या उठावानंतर हिंदू-मुस्लिमांच्यात फूट पाडली. हा २०२१ मधला भारत आहे, १९४७ मधला नाही. एकदा फाळणी झाली, पण आता ती पुन्हा होणार नाही, असेही भागवत म्हणाले. यापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना, गेल्या ७५ वर्षांत देशाने अपेक्षित प्रगती केलेली नाही. कारण आपण प्रगतीचा जो मार्ग निवडला तो योग्य नव्हता. भारतातील लोकांनी या भूमीला प्राचीन काळापासून आपली मातृभूमी मानली आहे. भारताची प्रगती कोणीच रोखू शकत नाही, असे मोहन भागवत यांनी सांगितले होते. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत