शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं! RSS सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरला जाणार; जातीय हिंसाचारानंतर प्रथमच ३ दिवसीय दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:20 IST

RSS Chief Mohan Bhagwat Manipur Visit: RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांचा मणिपूर दौरा कसा असेल, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

RSS Chief Mohan Bhagwat Manipur Visit: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तीन दिवसीय मणिपूर दौऱ्यावर जात आहे. मणिपूर येथे दोन वर्षांपूर्वी घडलेल्या जातीय हिंसाचारानंतर प्रथमच मोहन भागवत यांचा हा दौरा नियोजित करण्यात आला आहे. याबाबत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. २० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर असे तीन दिवस मोहन भागवत मणिपूरमध्ये असणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांचा हा दौरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS च्या शताब्दी सोहळ्याशी निगडीत आहे. मोहन भागवत २० नोव्हेंबर रोजी गुवाहाटीहून मणिपूरला जाणार आहेत. २२ नोव्हेंबर रोजी ते मणिपूर येथून प्रस्थान करतील. राज्यात हिंसाचार सुरू झाल्यापासून मणिपूरला हा त्यांचा पहिलाच दौरा असल्याचे संघाचे पदाधिकारी तरुणकुमार शर्मा यांनी सांगितले. यापूर्वी मोहन भागवत यांनी २०२२ मध्ये मणिपूरला भेट दिली होती.

मणिपूर दौऱ्यात मोहन भागवत कुणाला भेटणार?

या दौऱ्यादरम्यान मोहन भागवत विविध गटांशी संवाद साधतील. आरएसएस प्रमुखांच्या कार्यक्रमात काही नागरिक, स्थानिक आदिवासी समुदायाचे प्रतिनिधी आणि युवा नेते यांचा समावेश असेल. तरुण कुमार शर्मा म्हणाले की, ज्या दिवशी मोहन भागवत मणिपूरला पोहोचतील त्या दिवशी ते इंफाळमधील कोंजेंग लीकाई येथे एका कार्यक्रमात उद्योजक आणि प्रमुख लोकांना भेटतील. यानंतर, २१ नोव्हेंबर रोजी मोहन भागवत मणिपूरच्या आदिवासी समाजाच्या नेत्यांना भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील.

विस्थापितांच्या मदत छावण्यांना मोहन भागवत भेट देणार का?

गेल्या दोन वर्षांपासून विस्थापित लोक राहत असलेल्या मदत छावण्यांनाही संघ प्रमुख भेट देतील का असे विचारले असता, संघाचे राज्य सरचिटणीस तरुण कुमार शर्मा म्हणाले की, अद्याप अशी कोणतीही योजना नाही. हा दौरा प्रामुख्याने संघटनेचा अंतर्गत कार्यक्रम आहे. २०२३ पासून मणिपूरमध्ये मेतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारात २६० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि हजारो बेघर झाले आहेत.

दरम्यान, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची गरज नाही. ज्या व्यक्तीला भारताचा अभिमान वाटतो, ती प्रत्येक व्यक्ती हिंदूच आहे. हिंदू धर्माची ओळख केवळ धार्मिक नसून ती एक सभ्यतेची ओळख आहे. भारत आणि हिंदू एकच आहेत. भारत मूळतः 'हिंदू राष्ट्र'च आहे. त्यामुळे भारताला 'हिंदू राष्ट्र' होण्यासाठी कोणत्याही अधिकृत घोषणेची आवश्यकता नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले. गुवाहाटी येथे एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : RSS Chief Mohan Bhagwat to Visit Manipur After Violence

Web Summary : Mohan Bhagwat will visit Manipur for three days, his first trip since the ethnic violence. He will meet with community leaders, tribal representatives, and entrepreneurs during his visit. The visit is linked to RSS centenary celebrations.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतManipur Violenceमणिपूर हिंसाचारPoliticsराजकारण