शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आर.आर. प्रतिक्रिया- भाग १

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

नम्र स्वभावाचा राजकारणी गेला

नम्र स्वभावाचा राजकारणी गेला
- मान्यवरांची शोकसंवेदना :
नागपूर : माजी मंत्री आर.आर. पाटील यांच्या रूपात विनम्रता, उत्तम वक्ता, सामाजिक जाण असलेले नेतृत्व आणि मोकळं व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेल्याची खंत मान्यवरांनी व्यक्त केली. राजकारणात आबांसारखे नि:स्पृह नेते आणि मित्र लाभणे हे खरोखरच भाग्याचे असते. नम्र स्वभावाचा सर्वसमावेशक राजकारणी अशी आबांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात कायम राहील, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीचा चेहरा हरपला - अनिल देशमुख
माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. त्यांच्या रूपात राष्ट्रवादीचा एक चेहरा हरपला आहे, अशी खंत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. विनम्रता, उत्कृष्ट वक्ते, सामाजिक व राजकीय जाण आणि प्रचंड अभ्यासू व मेहनती प्रवृत्ती ही आबांच्या जमेची बाजू होती. मंत्रिपदाच्या कार्यकाळात आबांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. संपूर्ण महाराष्ट्रात डान्सबार बंदी राबविली. महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, गाडगेबाब ग्राम स्वच्छता अभियान राबवून त्यांनी महाराष्ट्राला एक वेगळी ओळख दिली, असेही देशमुख म्हणाले.

विकासाचे राजकारण करणारा नेता : कृष्णा खोपडे
राजकारणाचा वापर समाजाच्या विकासासाठी अधिकाधिक कसा करून घेता येईल, याचा सतत विचार करणारा नेता महाराष्ट्राने गमावला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली. आबा विरोधकांनाही विश्वासात घ्यायचे. लकडगंज पोलीस स्टेशन परिसरात १२ मजली संकुल उभारण्यासाठी मंजुरी देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली.

सामान्यांचा आवाज हरपला : चतुर्वेदी
महाराष्ट्रातील गरीब, उपेक्षित लोकांचे खरे समर्थक व त्यांची बाजू समजून घेणारे व्यक्तिमत्त्व आबांच्या रूपाने काळाच्या पडद्याआड झाले आहे. मंत्री असतानाही ते सामान्यांच्या प्रश्नांसाठी मंत्रिमंडळात आवाज उठवायचे. पक्षीय राजकारणाच्या सीमा ओलांडत त्यांनी काम केले. संपूर्ण महाराष्ट्र एका प्रामाणिक नेत्याच्या रूपात आर.आर. पाटील यांना कायम स्मरणात ठेवेल, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी व्यक्त केली.