पाटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांत एनडीए आघाडीच पुन्हा विजयी होणार, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी व्यक्त केला. ‘इंडिया आघाडीमध्ये समावेश असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचा (राजद) बिहारमध्ये पुन्हा जंगलराज आणण्याचा इरादा आहे,’ अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
बिहारच्या तीन दिवसांच्या दौऱ्याची सांगता करताना शाह यांनी सांगितले की, केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यामध्ये मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार असल्याने बिहारची उत्तम प्रकारे प्रगती होत आहे. त्यातून त्या राज्याला बरेच काही साध्य करता येईल. मात्र नवा मुखवटा धारण केलेला राजद बिहारमध्ये पुन्हा जंगलराज आणू इच्छित असून त्यामुळे जनतेने सावध राहावे. आगामी विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा एनडीएला विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘निकालानंतरच भाष्य’
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाबद्दल शाह म्हणाले की, त्यांचा नवा पक्ष असून तो पहिल्यांदाच निवडणुका लढविणार आहे. मतदान व निकाल घोषित झाल्यानंतर मी याबाबत भाष्य करीन. बिहारमधील लोकांना एनडीएच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत आहे, असेही ते म्हणाले.
Web Summary : Amit Shah asserts NDA will win Bihar elections, criticizing RJD's alleged intent to revive 'Jungle Raj.' He highlights Bihar's progress under Modi and Nitish Kumar, urging voters to re-elect NDA. Shah refrained from commenting on Prashant Kishor's party until election results.
Web Summary : अमित शाह ने कहा कि एनडीए बिहार चुनाव जीतेगा और राजद पर 'जंगल राज' को पुनर्जीवित करने का आरोप लगाया। उन्होंने मोदी और नीतीश कुमार के नेतृत्व में बिहार की प्रगति पर प्रकाश डाला और मतदाताओं से एनडीए को फिर से चुनने का आग्रह किया। शाह ने प्रशांत किशोर की पार्टी पर चुनाव परिणामों तक टिप्पणी करने से परहेज किया।