शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...

By बाळकृष्ण परब | Published: October 15, 2020 5:12 PM

Mohan Bhagwat statement on reservation News : देशाला पुढे नेण्यासाठी समाजातील विषमता मिटवावी लागेल. त्यासाठी समतेचे समर्थक असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन जाताना मनातील भावामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

ठळक मुद्देआरक्षणासाठीसुद्धा कायदे झाले आहेत. मात्र त्याचा लाभ सर्वांना मिळू शकत नाही ज्यांचे जिथे वर्चस्व आहे. तेच आरक्षणाचा लाभ घेत आहेतसमाजामध्ये जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत आरक्षण लागू राहिले पाहिजे

पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज आरक्षणाबाबत मोठे आणि महत्त्वपूर्ण विधान केले आहे. देशाला पुढे नेण्यासाठी समाजातील विषमता मिटवावी लागेल. त्यासाठी समतेचे समर्थक असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन जाताना मनातील भावामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आरक्षणासाठीसुद्धा कायदे झाले आहेत. मात्र त्याचा लाभ सर्वांना मिळू शकत नाही आहे. ज्यांचे जिथे वर्चस्व आहे. तेच आरक्षणाचा लाभ घेत आहेत. मात्र समाजामध्ये जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत आरक्षण लागू राहिले पाहिजे. आरक्षणाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे.पुण्यात झालेल्या दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समारंभात सामाजित समरसता या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत आपले विचार मांडताना सरसंघचालकांनी हे विधान केले. मोहन भागवत यांनी सांगितले की, सामाजिक समरसतेसाठी आपल्या आचरणामध्ये बदल घडवून आणला पाहिजे. हे आपल्याला करून दाखवावे लागेल. देश व्यापणारी विषमता उखडून टाकण्यासाठी समाजात परिवर्तन घडवून आणावे लागेल.सरसंघचालक म्हणाले की, ज्या लोकांना देशाचे तुकडे करायचे आहेत त्यांना समाजात ऐक्य प्रस्थापित होणे सहन होणार नाही. क्रांतीच्या मार्गाने समाजात समरसता आणता येणार नाही. घटनात्मक मार्गानेच समाजातील समस्यांवर तोडगा काढणे शक्य आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते.समतेशिवाय समरसता प्रस्थापित होणे शक्य नाही. त्यासाठी आपल्याला तयार राहिले पाहिजे. त्यासाठी झुकावे लागले तरी मी मागे हटणार नाही. जे वरच्या स्तरावर आहेत त्यांना झुकावे लागेल आणि जे खाली आहेत त्यांना हात पुढे करावा लागेल, तेव्हाच समाजाचा उद्धार होईल, असे सरसंघचालकांनी सांगितले.समाजात समरसता आणण्यासाठी आपल्या आचरणाचे उदाहरण लोकांसमोर ठेवावे लागेल. आधी करून नंतर दुसऱ्याला सांगावे लागेल. संघाचे स्वयंसेवक हे काम करत आहेत. सामाजिक समरसता मंचच्या लोकांनाही हे काम करावे लागेल. आपण सर्वांनी मिळून मिसळून सण, उत्सव साजरे केले पाहिजेत. आपली भाषा सुधारली पाहिजे. न्यायाच्या बाजूने उठणाऱ्या आवाजाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.दरम्यान, संपूर्ण समाज आपला आहे हा भाव घेऊन काम केले पाहिजे. मात्र काम करायचे आहे. घटनेची प्रस्तावना सर्वांच्या आचरणात यावी यासाठी वाणीचा दिवा पेटवून समरसता लोकांच्या हृदयात उतरवली पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघreservationआरक्षणIndiaभारतPoliticsराजकारण