शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

"लग्नाला विरोध करणं म्हणजे जीव देण्यास प्रवृत्त करणं नाही"; सुप्रीम कोर्टाचा मुलाच्या आईला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 17:34 IST

लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नसल्याचे, सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाने आत्महत्येशी संबंधित प्रकरणात महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ नुसार लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नसल्याचे, सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. लग्नासाठी असहमत दर्शवणे हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याचा आधार असू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. न्यायमूर्ती बीबी नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने एका महिलेवरील आरोपपत्र रद्द करताना ही टिप्पणी केली. महिलेवर एका तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे जिचे तिच्या मुलावर प्रेम होते. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय बाजूला ठेवत अपीलकर्त्याला दिलासा दिला आहे.

अपीलकर्त्याची आई आणि तरुणाच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. ज्या महिलेविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, तिच्यावर लग्नाला विरोध केल्याचा आणि तरुणीविरुद्ध अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप होता. लग्नाला विरोध आणि अपमानजकन वक्तव्य जिव्हारी लागल्याने तरुणीने टोकाचे पाऊल उचलले होते. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबियांनी मुलाची आईविरोधात कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणाची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने आरोपपत्र आणि साक्षीदारांच्या जबाबांसह रेकॉर्डवरील सर्व पुरावे खरे मानले तरी, अपीलकर्त्याविरुद्ध एकही पुरावा नसल्याचे म्हटलं.

"प्रियकरासोबत लग्न केलं नाही तर तू जगू शकत नाही का असं म्हणणं आत्महत्येला प्रवृत्त करण्यासारखं नाही. आम्हाला वाटते की अपीलकर्त्याचे कृत्य इतके दूरगामी आणि अप्रत्यक्ष आहे की ते कलम ३०६ अंतर्गत गुन्हा ठरत नाही. मृत व्यक्तीकडे आत्महत्येसारखे दुर्दैवी कृत्य करण्याशिवाय पर्याय नव्हता असं अपीलकर्त्याने काहीही म्हटलं असल्याचा आरोप नाही," असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं.

"अपीलकर्ता आणि तिच्या कुटुंबाने मृत तरुणीवर तिचे आणि अपीलकर्त्याच्या मुलाचे नाते संपुष्टात आणण्यासाठी कोणताही दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही. खरं तर मृताचे कुटुंबच या नात्यावर नाखूष होते. जरी अपीलकर्त्याने मुलगा आणि मृताच्या लग्नाबाबत असहमत व्यक्त केले असले तरी ते आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आरोपासारखं नाही. तसेच मृत तरुणीला ती तिच्या प्रियकराशी लग्न केल्याशिवाय जगू शकत नसेल तर तिने जगू नये, असं म्हणणं देखील चिथावणी देणारे ठरणार नाही," असंही कोर्टानं म्हटलं.

दरम्यान, अपीलकर्त्या महिलेला ट्रायल कोर्टातून दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर कोलकाता हायकोर्टानेही हा आदेश कायम ठेवला होता. त्यामुळे महिलेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयmarriageलग्न