शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानासाठी शाहरुखचा हातात झाडू घ्यायला नकार

By admin | Updated: November 13, 2014 10:41 IST

अभिनेता शाहरुख खान याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानासाठी हातात झाडू घ्यायला नकार दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १२ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाला सेलिब्रिटी आणि राजकारणी यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी अभिनेता शाहरुख खान याने मोदींच्या या अभियानासाठी हातात झाडू घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र मोदींच्या या अभियानाला पाठिंबा दर्शवत यामुळे जनतेमध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचत असल्याचे शाहरुखने म्हटले आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोंबर रोजी स्वच्छ भारत अभियान ही मोहीम सुरु केली आहे.  या मोहीमेत शाहरुखही हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरणार का असा सवाल शाहरुखला विचारण्यात आला. यावर शाहरुख म्हणतो, मला हातात झाडू घ्यायला आवडत नाही. पंतप्रधान आणि अन्य सेलिब्रिटींनी ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. सेलिब्रिटींनी या मोहीमेत सहभाग घेतल्याने जनतेमध्ये जनजागृती होते व यापुढे कचरा फेकताना ते विचार करतील, हेच या मोहीमेचे उद्देश असल्याचे शाहरुखने सांगितले.  टेनिसपटू सानिया मिर्झाने शाहरुख खानला स्वच्छ भारत मोहीमेसाठी नॉमिनेट केले होते.